AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Political Crisis : बाळासाहेब ठाकरे असते तर काय झालं असतं? शिंदेंनी बंडखोरी करण्याची हिंमत केली असती?

ट्वीटरवर बाळासाहेबांनी केलेलं वक्तव्य व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात, भगवा झेंडा आणि हिंदुत्वामुळं शिवसेनेला मान-सन्मान मिळतो. त्यामुळं याच्याशी कधी गद्दारी केली जाऊ शकत नाही. शिवसेनेला काँग्रेससारखं होऊ देणार नाही. मला माहीत आहे की, असं झालं तर मला माझी दुकान बंद करावी लागेल.

Maharashtra Political Crisis : बाळासाहेब ठाकरे असते तर काय झालं असतं? शिंदेंनी बंडखोरी करण्याची हिंमत केली असती?
बाळासाहेब ठाकरे असते तर काय झालं असतं?
| Edited By: | Updated on: Jun 29, 2022 | 3:23 PM
Share

सुरेंद्र कुमार वर्मा

मुंबई : शिवसेना आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर छोटी-मोठी बंडखोरी होती होती. पण, त्यांच्यासमोर उभे राहण्याची हिंमत सहसा कुणाची होत नव्हती. नारायण राणे (Narayan Rane), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिवसेना सोडली. बाळासाहेबांच्या मार्गानं उद्धव ठाकरे गेले असते तर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला नसता. उद्धव ठाकरे यांच्या हातून मुख्यमंत्री पद जाण्याची शक्यता आहे. पक्षावरूनही त्यांचं नियंत्रण कमी झाल्यास दिसून येते. शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंनी तयार केली. तोच पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्या हातातून जाताना दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना कशी हाताळली असती, असा प्रश्न निर्माण होत आहे. ज्या सिद्धांतासाठी बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केला होता, उद्धव ठाकरे त्या सिद्धांतांपासून दूर जाताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळं शिवसेना दोन गटात विभाजित झाली आहे.

भगवा झेंडा, हिंदुत्वामुळे सेनेला मान-सन्मान

ट्वीटरवर बाळासाहेबांनी केलेलं वक्तव्य व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात, भगवा झेंडा आणि हिंदुत्वामुळं शिवसेनेला मान-सन्मान मिळतो. त्यामुळं याच्याशी कधी गद्दारी केली जाऊ शकत नाही. शिवसेनेला काँग्रेससारखं होऊ देणार नाही. मला माहीत आहे की, असं झालं तर मला माझी दुकान बंद करावी लागेल. देशात काही अव्यवहारिक आघाडी सरकार तयार झालीत. तरीही शिवसेनेनं आपला मतदार गमावला नाही. उत्तर प्रदेशात बसपा आणि भाजपाची सरकार आली. परंतु, मायावती यांनी आपले मतदार राखून ठेवले. परंतु, काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केल्यामुळं मतदार शिवसेनेपासून दुरावले गेलेत, अशी सध्याची परिस्थिती आहे.

मी नसतो तर शिवसेना काँग्रेससारखी

बाळासाहेबांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात ते म्हणतात, ते राष्ट्रवादीसोबत कधीही सरकार स्थापन करणार नाहीत. बाळासाहेब व्हिडीओत म्हणतात, ज्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची सरकार पाडली. त्यांच्यासोबत सरकार स्थापन्याचा विचारही करू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणतात, सोनिया गांधींसमोर नमत घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मी आहे म्हणून शिवसेना आहे. मी नसतो तर शिवसेना काँग्रेससारखी झाली असती.

Follow Us
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.