AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा, कलिंगड किती रुपयांनी स्वस्त? आवक वाढल्याने दर कोसळले, अमेरिका–इस्रायल–इराण युद्धाचा मोठा फटका

इरण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धाच्या तणावाचे पडसाद आता थेट शेतकऱ्यांवर उमटताना दिसत आहेत. अमेरिका इराण संघर्षामुळे निर्यात मार्गांवर परिणाम झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतमाल देशांतर्गत बाजारात येत असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भाज्या, फळे आणि इतर शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर कोसळले असून शेतकरी आणि व्यापारी दोघेही चिंतेत आहेत.

| Updated on: Mar 11, 2026 | 1:13 PM
Share
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता कृषी क्षेत्रावरही दिसू लागला आहे. इरण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धाचा  या तणावामुळे आंतरराष्ट्रीय निर्यातीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. निर्यात मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा माल परदेशात न जाता देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे.

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता कृषी क्षेत्रावरही दिसू लागला आहे. इरण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धाचा या तणावामुळे आंतरराष्ट्रीय निर्यातीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. निर्यात मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा माल परदेशात न जाता देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे.

1 / 6
याचा थेट परिणाम कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिसून येत आहे. बाजार समितीत भाज्या, फळे, फुले, कांदे आणि बटाट्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र आवक वाढल्याने दर कोसळले असून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही.

याचा थेट परिणाम कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिसून येत आहे. बाजार समितीत भाज्या, फळे, फुले, कांदे आणि बटाट्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र आवक वाढल्याने दर कोसळले असून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही.

2 / 6
कालपर्यंत सुमारे 20 रुपयांना विकला जाणारा कांदा आता 10 ते 12 रुपयांवर आला आहे. तर 40 रुपयांना विकले जाणारे कलिंगड 12 रुपयांपर्यंत घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

कालपर्यंत सुमारे 20 रुपयांना विकला जाणारा कांदा आता 10 ते 12 रुपयांवर आला आहे. तर 40 रुपयांना विकले जाणारे कलिंगड 12 रुपयांपर्यंत घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

3 / 6
दुसरीकडे बाजारात मालाचा साठा वाढल्याने ग्राहक कमी पडत आहेत. त्यामुळे काही व्यापाऱ्यांचा माल विकला न गेल्याने दुसऱ्या दिवशी तो सडण्याची वेळ येत आहे. परिणामी पालेभाज्या, फळे आणि फुलांचा मोठा साठा बाजार समितीतच पडून राहत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

दुसरीकडे बाजारात मालाचा साठा वाढल्याने ग्राहक कमी पडत आहेत. त्यामुळे काही व्यापाऱ्यांचा माल विकला न गेल्याने दुसऱ्या दिवशी तो सडण्याची वेळ येत आहे. परिणामी पालेभाज्या, फळे आणि फुलांचा मोठा साठा बाजार समितीतच पडून राहत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

4 / 6
 कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडगे यांनी सांगितले की, निर्यात बंद झाल्यामुळे बाजारात शेतमालाची आवक वाढली असून ग्राहक कमी असल्याने मोठ्या प्रमाणात माल सडत आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही अडचणीत आले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडगे यांनी सांगितले की, निर्यात बंद झाल्यामुळे बाजारात शेतमालाची आवक वाढली असून ग्राहक कमी असल्याने मोठ्या प्रमाणात माल सडत आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही अडचणीत आले आहेत.

5 / 6
दरम्यान, बाजारात मोठ्या प्रमाणात माल येत असला तरी विक्री होत नसल्याने व्यापाऱ्यांसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातच हॉटेल व्यवसायात कमर्शियल गॅसचा तुटवडा असल्याने हॉटेलमध्ये होणारी भाजीपाला विक्रीही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिस्थिती अशीच राहिली तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, बाजारात मोठ्या प्रमाणात माल येत असला तरी विक्री होत नसल्याने व्यापाऱ्यांसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातच हॉटेल व्यवसायात कमर्शियल गॅसचा तुटवडा असल्याने हॉटेलमध्ये होणारी भाजीपाला विक्रीही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिस्थिती अशीच राहिली तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

6 / 6
Follow Us
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच... हे काय घडलं?
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट...
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?