AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress : राजस्थानातील अंतर्गत मतभेद मिटणार की वाढणार, अशोक गहलोत यांनी स्पष्टच सांगितले

राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय स्थितीनंतर गहलोत आणि सोनिया गांधी यांची चर्चा झाली आहे. त्यानंतर अशोक गहलोत यांनी नेमकी काय भूमिका घेतली यावरच राजस्थानची राजकीय स्थिती काय हे ठरणार आहे.

Congress : राजस्थानातील अंतर्गत मतभेद मिटणार की वाढणार, अशोक गहलोत यांनी स्पष्टच सांगितले
मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Sep 27, 2022 | 6:25 PM
Share

मुंबई : कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या (Congress President) निवडीपूर्वीच राजस्थानात मुख्यमंत्री पदावरुन घमसान सुरु झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट (Sachin Pilot) यांना स्विकारण्यास पक्षातील आमदारांची ना आहे. तर अशोक गहलोत हे पक्षाच्या अध्यक्ष पदाची निवडणुक लढविणार आहेत. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून राजस्थानमध्ये राजकीय नाट्य रंगले असून अखेर अशोक गहलोत (Ashok Gehlot) आणि सोनिया गांधी यांची याबाबत चर्चा झाली आहे. या दरम्यान, आपण हायकमांडचे मन दुखविणार नसल्याचे गहलोत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, निर्माण झालेल्या स्थितीवर तोडगा कसा काढला जाणार याबाबत त्यांनी काही सांगितले नाही.

राजस्थानचे सध्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे आता कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहेत. पुढील महिन्यात ही निवडणूक होणार आहे. मात्र, एक व्यक्ती, एक पद हे कॉंग्रेसचे धोरण असल्याने त्यांना राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

अशोक गहलोत हेच मुख्यमंत्री रहावेत अशी ईच्छा आमदारांची आहे. तर याबाबत झालेल्या बैठकीनंतर 92 कॉंग्रेसच्या आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे राजस्थानचे राजकारण चांगलेच तापले होते. तर सचिन पायलट यांना केवळ 10 आमदारांचा पाठिंबा होता.

राजस्थानात निर्माण झालेल्या परस्थितीमुळे गहलोत आणि सोनियां गांधी यांची यावर चर्चा झाली आहे. त्यानंतर मात्र, गहलोत यांनी आपली भूमिका मांडली असून हायकमांडची निराशा होईल असा एकही निर्णय घेतला जाणार नाही. शिवाय वरिष्ठांचा जो निर्णय असेल तोच आपल्यासाठी अंतिम राहिल असेही गहलोत म्हणाले आहेत.

अध्यक्षपदी कोण इथपर्यंत पक्षाचेही असे काही ठरलेले नाही, राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या परस्थितीनंतर सोनिया गांधी पुन्हा एकदा वरिष्ठ नेत्यांशी बोलणार आहेत. त्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे. अध्यक्ष पदाच्या निवडीपूर्वीच राजस्थानमध्ये निर्माण झालेली परस्थिती आटोक्यात आणावी लागणार आहे.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ