AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंशी इमान, शिंदे गटावर शरसंधान, संतोष बांगर यांना भिडणाऱ्या अयोध्या पौळ आहेत तरी कोण?

अयोध्या सोशल मीडियावर चांगल्याच एक्टीव्ह आहेत. त्या शिवसेनाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक आहेत. एक विशेष गोष्ट म्हणजे त्या LGBT म्हणजेच समलिंगी समाजाच्या हक्काला समर्थन देतात.

उद्धव ठाकरेंशी इमान, शिंदे गटावर शरसंधान, संतोष बांगर यांना भिडणाऱ्या अयोध्या पौळ आहेत तरी कोण?
संजय बांगर यांच्यावर टीका केल्यापासून अयोध्या पौळ चर्चेत आहेत
| Updated on: Sep 28, 2022 | 7:09 PM
Share

नाजीर खान, परभणी: संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्याशी थेट पंगा घेणाऱ्या, मातोश्री हाच माझा बाप आणि आई म्हणणाऱ्या आणि ज्यांना शिवसेना पक्षप्रमुख थेट उद्धव ठाकरेंनी फोन केला, त्या अयोध्या पोळ (Ayodhya Poul) पाटील. अयोध्या यांचं नाव अचानक चर्चेत आलं आहे, आणि याला कारण आहे, संतोष बांगर यांना दिलेलं आव्हान, त्यांच्या समर्थकांना दिलेलं प्रत्युत्तर आणि सोशल मीडियातून शिवसेनेच्या ठाकरे गटाची (Uddhav Thackeray Group) मांडणारी रोखठोक भूमिका. मात्र, या दोन दिवसांच्या आधी कदाचित अयोध्या पोळ पाटील कोण? असं जर विचारलं असतं, तर कदाचित कुणाला सांगताही आलं नसतं. मात्र, जसा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर हल्ला झाला, तसं अयोध्या पोळ पाटील हे नाव चर्चेत आलं.

अयोध्या पोळ पाटील या मूळच्या परभणी जिल्ह्यातल्या. पालम तालुक्यातलं फळा हे त्यांचं मूळ गाव. वडीलांचं नाव गुणाजीराव तर आईचं नाव गंगाबाई. अयोध्या यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केलं. त्यानंतर पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत झालं. गेली 12 वर्षांपासून त्या मुंबईतच राहतात. त्यामुळे परभणीत त्या सक्रीय नाहीत. अयोध्या यांच्या आजी मुंबईत राहतात,त्यांच्याकडेच त्या वास्तव्यास आहेत. उद्धव ठाकरेंनी जेव्हा अयोध्या यांना फोन केला, तेव्हाही त्यांनी ही माहिती सांगितली होती.

अयोध्या पौळ यांचे आई आणि वडील:

आता प्रश्न पडतो, अयोध्या शिवसेनेत कधी आल्या आणि त्यांना काही राजकीय पार्श्वभूमी आहे का? तर लहानपणापासून त्यांना शिवसेनेचं बाळकडू मिळालं. त्यांच्या आई म्हणजेच गंगूबाई या शिवसेनेच्या पालम तालुका प्रमुख होत्या. म्हणजेच घरातूनच त्यांना शिवसेनेचं बाळकडू मिळालं.बाल शिवसैनिक ते युवा सेना असा त्यांचा प्रवास झाला. मुंबईतील धारावी युवती विधानसभा समन्वय म्हणूनही त्या काम पाहतात.

अयोध्या सोशल मीडियावर चांगल्याच एक्टीव्ह आहेत. त्या शिवसेनाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक आहेत. त्यांच्या फेसबूकवरही याचा उल्लेख आहे. जन्मभूमी परभणी, कर्मभूमी मुंबई असा त्यांनी उल्लेख केलेला आहे.

हेच नाही, एक विशेष गोष्ट म्हणजे त्या LGBT म्हणजेच समलिंगी समाजाच्या हक्काला समर्थन देतात. याशिवाय, अयोध्या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या कामही करतात.

अयोध्या पौळ यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप:

अयोध्या पौळ या सोशल मीडियावर चांगल्याच एक्टीव्ह आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्या शिंदे गट, भाजपवर नेहमी निशाणा साधतात. त्यातच संतोष बांगर यांच्या गाडीवर जेव्हा हल्ला झाला, त्याहीवेळी त्यांनी थेट शिंदे गटाला निशाण्यावर घेतलं, आणि यामुळे राग अनावर झाल्याने एका बांगर समर्थकाने पौळ यांना अर्वाच्च भाषेत फोन कॉल केला.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.