AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : आमदार तर आमदार आता खासदारही भाजपच्या बाजूने; उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाशी जुळवून घेणं का गरजेचं आहे?

Uddhav Thackeray : बंडखोरी केल्यानंतर बंडखोर आमदारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. आम्ही सत्तेसाठी भाजपसोबत गेलो नाही. भाजप हा आपला नैसर्गिक मित्रं आहे.

Uddhav Thackeray : आमदार तर आमदार आता खासदारही भाजपच्या बाजूने; उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाशी जुळवून घेणं का गरजेचं आहे?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 06, 2022 | 1:11 PM
Share

मुंबई: संकटं येतात तर ती एकटी येत नाहीत. चोहोबाजूने येतात. त्यामुळे मोठा फटका तर बसतोच, पण त्या संकटातून सावरणं कठिण होत असतं. संकटाचा काळ हा खऱ्या अर्थाने कसोटीचा काळ असतो. या काळात तुम्ही कसे उभे राहता आणि अशा काळात कसे निर्णय घेता यावर सर्व काही अवलंबून असतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याबाबतही असंच काहीसं घडताना दिसत आहे. 40 आमदारांनी बंड करून भाजपसोबत (bjp) हातमिळवणी केली. या बंडखोर आमदारांसोबत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यही गेले आहेत. एवढ्या मोठ्या बंडानंतर शिवसेनेला (shivsena) मोठा हादरा बसला. त्यामुळे राज्यातील सत्ता गेली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता तर शिवसेनेवरच बंडखोरांनी दावा सांगितल्याने शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे थोडं होतं की काय आता खासदारांनीही भाजपशी जुळवून घेण्याची हाकाटी पक्षप्रमुखांकडे लावली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहनच खासदारांनी केलं आहे. त्यामुळे शिवसेनेला आता भाजपशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. शिवसेनेने भाजपशी जुळवून घेणं कसं गरजेचं आहे, यावरही आता चर्चा सुरू झाली आहे.

दुसरा भूकंप नको म्हणून

बंडखोरी केल्यानंतर बंडखोर आमदारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. आम्ही सत्तेसाठी भाजपसोबत गेलो नाही. भाजप हा आपला नैसर्गिक मित्रं आहे. त्यामुळे त्यांच्याशी युती झाली पाहिजे. आघाडीसोबत युती हे आम्हाला पटलेलं नाही, असं या आमदारांनी सांगितलं. तेच आता खासदारही म्हणताना दिसत आहेत. त्यांनाही भाजपसोबत युती हवी आहे. त्यामुळेच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देऊन एक पाऊल पुढे टाकण्याचं आवाहन शिवसेना खासदारांनी केलं आहे. त्यामुळे पक्षात दुसरा भूकंप होऊ नये म्हणून ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेणं आवश्यक झालं आहे. नाही तर आमदार तर गेलेच पण आता हातातून खासदारही निसटण्याची चिन्हे आहेत.

पक्षाची मान्यता वाचवण्यासाठी

शिंदे गटाच्या बंडखोरांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेला अनेक शह दिले आहेत. शिंदे गटाला गटनेतेपद मिळालं आहे. तसेच शिंदे गटाच्या पक्षप्रतोदपदालाच मान्यता मिळाली आहे. आता शिंदे गटाकडून आपणच खरी शिवसेना असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी आता शिंदे गटाकडून पक्षाच्या चिन्हावर दावा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे पक्षाची मान्यता टिकवण्यासाठी आणि शिवसेनेचं नेतृत्व ठाकरे घराण्याकडेच असल्याचं दाखवण्यासाठीही शिवसेनेला भाजप सोबत जुळवून घ्यावं लागणार आहे. भाजपशी जुळवून घेतल्यास खासदार शिवसेनेतच राहतील. शिवाय बंडखोर आमदारही शिवसेनेत येतील. त्यामुळे पक्ष वाचेल आणि सत्ताही मिळेल.

खासदार सोबत ठेवणं गरजेचं

40 आमदार पक्षाला सोडून गेले आहेत. विधानसभा निवडणुकांना अजून अडीच वर्षावर आहेत. अडीच वर्ष हा मोठा काळ आहे. या काळात पक्ष वाढवणे हे सर्वात मोठं आव्हान शिवसेनेसमोर आहे. त्यामुळे खासदारांनी बंड करू नये म्हणून शिवसेनेला भाजपशी जुळवून घेणं महत्त्वाचं आहे.

मतदारांवर पकड ठेवण्यासाठी

40 आमदार सोडून गेल्यानंतर त्या मतदारसंघातील खासदार आपल्यासोबत ठेवणं शिवसेनेला अत्यंत महत्त्वाचं आहे. हे खासदार सोबत राहिल्यास बंडखोर आमदारांच्या मतदारसंघावर शिवसेनेला वर्चस्व ठेवता येणार आहे. शिवाय महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर अंकूश ठेवता येणार आहे. पण खासदारच जर भाजपसोबत गेल्यास अडचण होऊ शकते. त्यामुळे भाजपसोबत जुळवून घेणं अगत्याचं झालं आहे.

पक्षाचा लोकशाहीवर विश्वास असल्याचं दाखवण्यासाठी

40 आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत लोकशाही असल्याचं उद्धव ठाकरे यांना दाखवावं लागणार आहे. पक्ष चार दोन लोकांच्या भरवश्यावर चालत असल्याचा आरोप बंडखोरांनी केला आहे. त्याला छेद देण्यासाठी शिवसेनेला निर्णय घ्यावा लागणार आहे. खासदारांचं ऐकून भाजपशी जुळवून घेतल्यास शिवसेना हा लोकशाहीने चालणारा पक्ष असल्याचं उद्धव ठाकरे यांना बिंबवता येणार आहे. पक्षात आपलं ऐकलं जातं आणि त्यावर अंमलबजावणीही केली जाते, असा विश्वास शिवसैनिकांमध्ये निर्माण करण्यासाठीही भाजपशी जुळवून घ्याव लागणार आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?