महाराष्ट्रात दिलदार मुख्यमंत्री, फडणवीसांना सत्ता गेल्याचं सहन होईना : यशोमती ठाकूर

राज्यात दिलदार मुख्यमंत्री आणि शरद पवार, सोनिया गांधी असल्याने राज्यातील सराकर स्थिर असल्याचं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

महाराष्ट्रात दिलदार मुख्यमंत्री, फडणवीसांना सत्ता गेल्याचं सहन होईना : यशोमती ठाकूर
Follow us
| Updated on: Jul 13, 2020 | 7:05 PM

मुंबई : राजस्थानातील राजकीय अस्थिरतेवर (Yashomati Thakur Criticize BJP) आता महाराष्ट्रातील नेतेमंडळीही आपली प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला घोडेबाजाराची सवय आहे, त्यांना पैशाचा उन्मात आहे, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच, राज्यात दिलदार मुख्यमंत्री आणि शरद पवार, सोनिया गांधी असल्याने राज्यातील सराकर स्थिर असल्याचंही त्या म्हणाल्या (Yashomati Thakur Criticize BJP).

भाजपला घोडेबाजाराची सवय आहे. त्यांना पैशाचा उन्मात आहे. कर्नाटकात मी हे अनुभवलं आहे. हे सगळं राजकीय संस्कृतीच्या विरोधात आहे. महाराष्ट्रात दिलदार मुख्यमंत्री आहेत, शरद पवार आणि सोनिया गांधी आहेत, त्यामुळे राज्यात सत्ता स्थिर आहे”, असं महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

“आदरणीय देवेंद्र फडणवीस आमच्या विदर्भातील आहेत. मात्र, त्यांना सत्ता नसलेलं सहन होत नाही”, अशी टीका महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांवर केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

राजस्थानमधील गहलोत सरकार डळमळीत

मुख्यमंत्री अशोक गहलोत (Rajsthan CM Ashok Gehlot) यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकार डळमळीत (Rajasthan Political Crisis) करण्याचे राजकारण सध्या राजस्थानमध्ये सुरु आहे. राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये आज काँग्रेस विधीमंडळाची बैठक झाली. या बैठकीला तब्बल 107 आमदारांनी हजेरी लावली. त्यामुळे अशोक गहलोत सरकार स्थिर असल्याचं सिद्ध झालं.

उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या बंडाने तसेच त्यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटीगाठीने, काँग्रेसच्या सत्तेवरील ढग काळवंडले आहेत. सचिन पायलट यांनी कालच सध्याचे भाजप नेते आणि त्यांचे काँग्रेसमधील जुने मित्र असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली होती.

राजस्थानमधील 200 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत काँग्रेसचे 107, भाजप 72 तर इतर आणि अपक्ष असे एकूण 21 आमदार आहेत. इथे स्थापनेसाठी 101 जागांची आवश्यकता आहे. तो आकडा काँग्रेसने सहज पार केला आहे. काँग्रेसला अपक्षांचीही साथ आहे.

Yashomati Thakur Criticize BJP

नेमकं प्रकरण काय?

राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या जागांच्या गणिताच्या आधारे दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार, तर उर्वरित एका जागेवर भाजप उमेदवार राज्यसभेवर पोहोचू शकेल, हे निश्चित झाले होते. काँग्रेसने केसी वेणुगोपाल आणि नीरज डांगी यांना उमेदवारी दिली, पण भाजपने मोठे डावपेच आखल्याचं चित्र आहे.

Yashomati Thakur Criticize BJP

संबंधित बातम्या :

मोदी-शाह दिल्लीत तर फडणवीस महाराष्ट्रात नवेच, ‘नया है वह’ वरुन संजय राऊतांचा पलटवार

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.