AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्लिगी जमातने देशाची माफी मागावी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी

तब्लिगी जमाच्या बेजबाबदारपणावर बोट ठेवत मुस्लिम सत्यशोधक मंडळाने त्यांच्या जाहीर माफीची मागणी केली आहे (Muslim Satyashodhak Mandal on Tablighi Jamaat amid Corona ).

तब्लिगी जमातने देशाची माफी मागावी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी
| Updated on: Apr 07, 2020 | 8:43 PM
Share

पुणे : तब्लिगी जमाच्या बेजबाबदारपणावर बोट ठेवत मुस्लिम सत्यशोधक मंडळाने त्यांच्या जाहीर माफीची मागणी केली आहे (Muslim Satyashodhak Mandal on Tablighi Jamaat amid Corona ). मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी याबाबत मागणी केली आहे. दिल्लीतील निजामुद्दिन येथे मरकजमध्ये तब्लिगी जमातचा कर्तव्य पालनातील अधर्म पुढे आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येस तब्लिगी जमातचा बेजबबादारपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे तब्लिगीच्या असंवेदनशील वर्तनाबद्दल मुस्लिम समाजातही असंतोष असल्याचं मत शमशुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केलं आहे.

शमसुद्दीन तांबोळी यांनी म्हटलं आहे, “तब्लिगीच्या वर्तनावर टीका करत भारतातील धार्मिक तेढ वाढवण्यास कारणीभूत ठरेल असा मजकूर सोशल मीडियात फिरत होता. त्यामुळे समाजात संशय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा खोट्या बनावट पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच पोलिस ठाण्यात काही गुन्हेही नोंदवण्यात आले. त्यामुळे समाजाला अनामिक भीतीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. आहे. राज ठाकरे यांनी तब्लिगीला गोळ्या घाला, असं प्रक्षोभक विधान केलं आहे. तसेच लॉकडाऊन संपल्यानंतर गाठ आमच्याशी आहे, असं म्हटलं. त्यामुळे पुन्हा समाजात घबराट निर्माण झाली आहे. सर्वसामान्य मुस्लिमांची असुरक्षितता वाढत असतानाच, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या तब्लिगी जमातने ताबडतोब तोबानामा (माफीनामा) करुन संपूर्ण भारतीयांची माफी मागावी.”

येत्या बुधवारी शब्बे बारात आहे. या निमित्त लोक मस्जिदमध्ये नमाज अदा करतात आणि कबरस्थानात जावून प्रार्थना करतात. 15 दिवसानंतर रमजान महिना सूरु होत आहे. मुस्लिम समाजात रमजानला फार महत्व असते. महिनाभर उपास, नमाज, कुरान पठण केले जाते. ईदगाहवर जावून सामुदायिक नमाज आदा करणे, आप्तस्वकीय आणि समाजबांधवाना गळाभेट – अलिंगन दिले जाते. हे सर्व कोरोना विषाणु पसरवण्यात आणि कोरोनाग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरु शकतात. मानवतेसमोरील या संकटास प्रतिबंध करण्यासाठी सर्व धार्मिक सण आणि श्रद्धा आपल्या घराच्या चार भिंतीच्या आत मर्यादीत ठेवाव्यात. शासन, प्रशासन आणि पोलिस यंत्रणेचा आदर करुन सर्व नियमांचे पालन करावे, असं आवाहन मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केलं आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाचा गुणाकार, रुग्णांची संख्या हजार पार!

Pune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू

बारामतीत कोरोनाचा विळखा वाढला, कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण

Muslim Satyashodhak Mandal on Tablighi Jamaat amid Corona

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.