AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्येष्ठ साहित्यिक ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांचे पुण्यात निधन

'झुलवा' कादंबरीमुळे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना वेगळी ओळख मिळाली आणि 'झुलवा'कार ही बिरुदावलीही प्राप्त झाली. (Zulwa Novelist Uttam Bandu Tupe passed away)

ज्येष्ठ साहित्यिक 'झुलवाकार' उत्तम बंडू तुपे यांचे पुण्यात निधन
| Updated on: Apr 26, 2020 | 12:17 PM
Share

पुणे : उपेक्षित आणि ग्रामीण जीवनाचं दर्शन आपल्या साहित्यातून घडवणारे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांचं पुण्यात निधन झालं. दीर्घ आजाराने वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अतिशय गाजलेल्या ‘झुलवा’ कादंबरीमुळे ‘झुलवा’कार नावाने ते ओळखले जात होते. (Zulwa Novelist Uttam Bandu Tupe passed away)

उत्तम बंडू तुपे उर्फ आप्पा हे यांच्या अनेक कादंबऱ्याना पुरस्कार मिळाले होते. ‘आंदण’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. ‘काट्यावरची पोट’ या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला होता. तर ‘झुलवा’ कादंबरीलाही राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. मात्र या कादंबरीमुळे तुपे यांना वेगळी ओळख मिळाली आणि ‘झुलवा’कार ही बिरुदावलीही त्यांना प्राप्त झाली.

खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भसम, चिपाड, इंजाल, झावळ, माती आणि माणसं या कादंबऱ्याही त्यांच्या विशेष गाजल्या होत्या. ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी ‘झुलवा’ कादंबरीवर आधारित नाटक दिग्दर्शित केलं होतं. अभिनेते सयाजी शिंदे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी नाटकात मुख्य भूमिका केल्या होत्या.

गेल्या अनेक महिन्यापासून उत्तम बंडू तुपे पक्षाघातामुळे आजारी होते. त्यांची पत्नी जिजा यांचेही काही महिन्यापूर्वीच पक्षाघातामुळे निधन झाले होते.

तुपे यांना त्रास वाढल्यामुळे दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुलं आहेत.

(Zulwa Novelist Uttam Bandu Tupe passed away)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.