AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाणक्य यांच्या मते, तरुणपणी झालेल्या ‘या’ चुका बनू शकतात पश्चात्तापाचे कारण

आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्रासह अनेक ग्रंथ लिहिले आहेत. आचार्य चाणक्य यांच्या मते, तारुण्यात एखाद्या व्यक्तीने केलेल्या या चुका त्यांना पश्चात्ताप करण्यास भाग पाडू शकतात. चला तर मग आजच्या या लेखात याबद्दल जाणून घेऊयात...

चाणक्य यांच्या मते, तरुणपणी झालेल्या 'या' चुका बनू शकतात पश्चात्तापाचे कारण
according to chanakya these mistakes of youth make you regret them for life Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 25, 2025 | 2:21 PM
Share

आचार्य चाणक्य यांना विष्णुगुप्त आणि कौटिल्य असेही म्हणतात. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात चाणक्य नीतीचा अवलंब केला तर ते तुमचे जीवन सोपे आणि यशस्वी होण्यास मदत करू शकतात. अशातच चाणक्य यांच्या नुसार तारुण्याचा काळ हा असा काळ असतो जो तुमचे भविष्य कसे असेल हे ठरवतो. त्यामुळे आचार्य चाणक्य म्हणतात की तारुण्यात केलेल्या काही चुका तुमच्या वृद्धापकाळात समस्या बनू शकतात. तुम्हाला काही काळांतराने तरूणपणात केलेल्या चुकांचा पश्चाताप होऊ शकतो. चला तर मग आजच्या या लेखात आपण चाणक्य यांनी तारूण्यात असताना कोणत्या चुका करणे टाळ्या पाहिजेत त्याबद्दल जाणून घेऊयात…

या चुकांचा तुम्हाला पश्चात्ताप होईल

आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीने आपले तारुण्य वाईट संगतीत घालवले असेल किंवा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले असेल तर त्याला नंतर या चुकांबद्दल पश्चात्ताप करावा लागतो. कारण या चुकांचा तारुण्यात फारसा परिणाम होत नाही, परंतु त्यांचा परिणाम पुढील आयुष्यात नक्कीच होतो.

संधी तुमच्या हातून निसटून जातात

एखाद्या व्यक्तीला त्याचे काम आज करायचे असते पण तो माणूस प्रत्येक काम उद्यापर्यंत पुढे ढकलत राहतो आणि कठोर परिश्रम टाळतो, अशा व्यक्तीला नंतर पश्चात्तापही करावा लागतो. कारण आचार्य चाणक्य म्हणतात की घाईमुळे बऱ्याचदा चांगल्या संधी हातून निसटतात. अशावेळेस पश्चात्तापाशिवाय काहीही करता येत नाही.

वेळ वाया घालवू नका

काही लोक त्यांचे तारुण्य पूर्णत्वाने जगण्यावर विश्वास ठेवतात आणि मजा करण्यात त्यांचा वेळ वाया घालवतात. यामुळे काही तरूण पिढी त्यांच्या करिअरकडे अजिबात लक्ष देत नाहीत. आचार्य चाणक्य म्हणतात की जर तुम्हाला तुमचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर तुमचा बहुतेक वेळ अभ्यासात आणि तुमचे ध्येय साध्य करण्यात घालवा.

हे इतरांना सांगू नका

तुम्ही तुमच्या काही गोष्टी इतरांना सांगू नका, अन्यथा त्या तुमच्या पश्चात्तापाचे कारण देखील बनू शकतात. जसे की जर तुम्हाला एखाद्याकडून अपमान सहन करावा लागला असेल, तर ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असली तरीही ती सर्वांसमोर उघड करू नका. कारण हे थट्टा करण्याचे कारण बनू शकते. त्यामुळे यांचा परिणाम तुमच्या मनावर आणि आयुष्यावर होत असतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.