AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

18 महिन्यानंतर केतु करणार राशीबदल, या राशींचं नशिब फळफळणार

ज्योतिषशास्त्रात, पापग्रह असलेल्या राहु केतुची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते. या दोन ग्रहांमुळे जातकांच्या आयुष्यात बरीच उलथापालथ होते. पण आता केतु ग्रहाच्या बदलामुळे काही जातकांना लाभ मिळणार आहे. 18 महिन्यानंतर केतु सूर्याच्या राशीत प्रवेश करणार आहे.

18 महिन्यानंतर केतु करणार राशीबदल, या राशींचं नशिब फळफळणार
केतू गोचर
| Updated on: Mar 01, 2025 | 10:19 PM
Share

राहु आणि केतु हे पापग्रह असून कायम एकमेकांसमोर उभे असतात. या ग्रहांचं शीर आणि धड वेगळं असल्याने कधीच एकाच राशीत एकत्र येत नाही. पण या ग्रहांच्या गोचरामुळे राशीचक्रात बरीच उलथापालथ होत असते. काही जातकांच्या आयुष्यात सकारात्मक, तर काही जातकांच्या आयुष्यात नकारात्मक बदल घडतात. केतु ग्रह 18 महिन्यानंतर सूर्याची स्वामित्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. खरं तर सूर्य आणि केतु एकत्र आले तर ग्रहण योग लागतो. पण यावेळेस सूर्य हा वृषभ राशीत असणार आहे. त्यामुळे केतु जरी सूर्याच्या राशीत असला तर सूर्य त्या राशीत नसल्याने तशी स्थिती उद्भवणार नाही. पण ग्रहांच्या या स्थितीमुळे तीन राशीच्या जातकांना लाभ होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घ्या.

या राशींना मिळणार लाभ

वृषभ : या राशीच्या जातकांना केतु ग्रहाची स्थिती लाभदायक ठरणार आहे. केतु दशम स्थानात असल्याने भौतिक सूखांची पूर्ति होऊ शकते. हा काळ या राशीच्या जातकांसाठी अनुकूल जाईल. या काळात करिअरमध्ये वेगळी उंची गाठाल. ठरवलेली कामं वेळेत होतील. तसेच आर्थिक गणितही सुटतील. या कालावाधीत प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करू शकता.

धनु : या राशीच्या भाग्य स्थानात केतु ग्रहाचं गोचर होणार आहे. त्यामुळे नशिबाची पूर्ण साथ या कालावधीत मिळेल. करिअरमध्ये उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. कामानिमित्त बाहेरगावी फिरण्याचा योग जुळून येईल. धार्मिक कार्य हातून पार पडतील.

तूळ : या राशीच्या लाभस्थानात केतु ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे दीड वर्षांचा कालावधी या राशीच्या जाताकांना चांगला जाईल. या कालावधीत उत्पन्नात भरघोस वाढ होईल. तसेच आर्थिक स्थिती मजबूत होईल. गेल्या काही वर्षांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. या कालावधीत योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास लाभ मिळेल. शेअर बाजार किंवा लॉटरीतून अनपेक्षित लाभ होऊ शकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.