AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : सूर्याच्या कृपेने या राशीच्या लोकांना प्राप्त होणार मान सन्मान, पिढीजात व्यावसायातून होणार लाभ

जेव्हा कुंडलीत सूर्याची स्थिती कमकुवत किंवा दुर्बल असते तेव्हा व्यक्तीला तणाव आणि संघर्षाचा सामना करावा लागतो. याशिवाय जेव्हा सूर्याची स्थिती उत्तम असते तेव्हा त्या जातकाची भरभराट होते.

Astrology : सूर्याच्या कृपेने या राशीच्या लोकांना प्राप्त होणार मान सन्मान, पिढीजात व्यावसायातून होणार लाभ
सूर्य संक्रमणImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 19, 2023 | 8:47 PM
Share

मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रात (Astrology) सूर्यदेवाला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याला ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. सूर्यदेवाच्या कृपेने माणूस नेहमी निरोगी राहतो. कुंडलीत सूर्य बलवान असेल तर जीवनात सुख, संपत्ती आणि कीर्ती मिळते. परंतु जेव्हा कुंडलीत सूर्याची स्थिती कमकुवत किंवा दुर्बल असते तेव्हा व्यक्तीला तणाव आणि संघर्षाचा सामना करावा लागतो. याशिवाय जेव्हा सूर्याची स्थिती उत्तम असते तेव्हा त्या जातकाची भरभराट होते. जेव्हा तो संक्रमण करतो तेव्हा सर्व 12 राशींवर त्याचा परिणाम होतो. 17 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश केला होता आणि आता 17 ऑगस्टपर्यंत येथे संक्रमण करेल. अशा परिस्थितीत या राशी बदलाचा व्यावसायिकांवर कसा परिणाम होईल. चला जाणून घेऊया.

या राशीच्या लोकांना होणार लाभ

कर्क

सूर्य नारायणाच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांच्या तेजात वाढ होईल, कारण सूर्य देव त्यांच्या राशीत पोहोचले आहे आणि 17 ऑगस्टपर्यंत येथेच राहणार आहे. समाजात मान-सन्मान मिळेल, पण नियमांचे भान ठेवावे लागेल. कर्क राशीच्या व्यावसायिकांना चांगला काळ असेल, त्यांना वेळेवर व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन काम करण्याची सवय लावावी लागेल. जे वडिलोपार्जित व्यवसाय करतात, त्यांना प्रगती होण्याचे चिन्ह आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल. व्यापाऱ्यांनी करचोरी टाळावी.  अन्यथा मोठा दंड भरावा लागू शकतो.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी रवि आपल्या लाभस्थानातून जात असून खर्चाच्या घरात पोहोचत आहे, त्यामुळे यावेळी खर्च अधिक होईल. उधळपट्टी होता कामा नये हे ध्यानात ठेवा. 17 ऑगस्टपर्यंतचा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल, त्यामुळे जे व्यावसायिक दीर्घकाळापासून परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी ही चांगली वेळ आहे आणि गुंतवणूक करू शकतात. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठीही गुंतवणूक करू शकता. जर कर्ज घेतले असेल तर वेळेवर पैसे परत करण्याच्या प्रक्रियेत खंड पडू नये, म्हणजे हप्ते जमा करत रहा.

कन्या

कन्या राशीच्या व्यापार्‍यांनी उधारीवर दिल्या असतील तर त्यांचे पैसे परत मिळेल, परंतु यासाठी तुम्हाला सक्रिय राहावे लागेल. कर्जबाजारी लोकांशी वाद घालावा लागेल. कुठलाही करार करतांना सावधानी बाळगा. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर कमी जोखमीच्या कामांमध्ये गुंतवणूक करा. आता मोठी रिस्क घेण्याची वेळ नाही. जोडीदाराशी ताळमेळ ठेवावा लागेल, कारण मतभेद झाल्यास व्यवसायात नुकसान होऊ शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.