AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guruwar Upay : पत्रिकेतील गुरूला अशा प्रकारे करा बलवान, वैवाहिक जीवन होईल सुखी

असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत गुरू ग्रहाशी संबंधित दोष असेल तर त्या व्यक्तीने गुरुवारी व्रत ठेवावे. या दिवशी बृहस्पती चालिसाचे पठण करावे.

Guruwar Upay : पत्रिकेतील गुरूला अशा प्रकारे करा बलवान, वैवाहिक जीवन होईल सुखी
गुरु
| Updated on: May 11, 2023 | 5:38 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मग्रंथानुसार, कोणत्याही देवतेचा विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी ज्योतिषशास्त्रात (Astrology) काही उपाय सांगण्यात आले आहेत. गुरुवारी श्री बृहस्पती चालिसाचे पठण केल्याने देव गुरु बृहस्पती प्रसन्न होऊ शकतात. तसेच हा पाठ केल्याने सुख-समृद्धी वाढते. असे म्हटले जाते की जेव्हा बृहस्पति पत्रिकेत बलवान असतो तेव्हा व्यक्तीचा कल शुभ कार्यांकडे वळू लागतो. बृहस्पती चालीसाचे पठण करण्यापूर्वी बृहस्पती देवाची पूजा नियमानुसार करावी, असे सांगितले जाते.

बृहस्पती चालिसाचे फायदे

ज्योतिष शास्त्रानुसार बृहस्पती चालीसाचे पठण केल्याने देव गुरु बृहस्पती प्रसन्न होतात आणि माणसाला बुद्धी, विवेक आणि ज्ञानाचा आशीर्वाद देतात. ती पद्धतशीरपणे केली तर व्यक्तीला सिद्धी प्राप्त होते, असे म्हणतात.

विवाह योग जुळून येतो

असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत गुरू ग्रहाशी संबंधित दोष असेल तर त्या व्यक्तीने गुरुवारी व्रत ठेवावे. या दिवशी बृहस्पती चालिसाचे पठण करावे. अशा स्थितीत ज्यांच्या लग्नाला उशीर होत असेल त्यांनी बृहस्पती चालिसाचा पाठ करावा. यामुळे लग्नाचे योग लवकर जुळून  येतात. याशिवाय वैवाहिक जीवनातला तणावही दूर होतो.

हे गुळाचे उपाय आहेत अत्यंत प्रभावी

  • गुरुवारी सकाळी आंघोळीनंतर केळीच्या झाडाला भिजवलेली हरभरा डाळ आणि गुळाचा गाळा घाला. असे सतत 5 गुरुवारपर्यंत केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. यासोबतच मनोकामनाही पूर्ण होतात.
  • गुरुवारी भगवान विष्णूला केळी अर्पण करावी. या दिवशी त्यांना पिवळी फुले, हरभरा डाळ आणि गुळ अर्पण करा. असे केल्याने भगवान विष्णूची कृपा होते आणि सुख-समृद्धी वाढते.
  • गुळाचा खडा, 7 अख्ख्या हळदीच्या कांड्या आणि एक रुपयाचे नाणे पिवळ्या कपड्यात बांधून गुरुवारी संध्याकाळी अज्ञात स्थळी फेकून द्या. असे केल्याने अपूर्ण मनोकामना लवकर पूर्ण होतात असे मानले जाते.
  • या दिवशी भगवान बृहस्पतिला गुळ अर्पण केल्याने बृहस्पति, सूर्य आणि मंगळ देखील सकारात्मक प्रभाव देतात. त्याच्या प्रभावामुळे गुरुवारी हे काम केल्याने तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही आणि काम सहज होईल. जर तुमच्या करिअरमध्ये अडथळा येत असेल किंवा तुम्ही मुलाखतीसाठी जात असाल तर घरातून बाहेर पडताना वाटेत गाईला मैदा किंवा गूळ खाऊ घालावा. असे केल्याने कामात यश मिळते असे मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार.
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ.
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.