AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सियाच्या अफेयरबद्दल थोडं जरी माहीत असतं तर… सियाच्या वडिलांची प्रतिक्रिया; बोलताना धाप लागली

Ketan Agarwal Siya Goyal : केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. आता सिया गोयलच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सियाच्या अफेयरबद्दल थोडं जरी माहीत असतं तर... सियाच्या वडिलांची प्रतिक्रिया; बोलताना धाप लागली
Sia Goyal Father ReactionImage Credit source: Google
| Updated on: Jun 26, 2026 | 5:54 PM
Share

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल याचा मृत्यू झाला होता. डोंगरावरून पाय घसरून पडल्याने अपघाती मृत्यूची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र संशयानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून या घटनेचा कट रचल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली आहे. सध्या दोघांनाही 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. असातच आता सिया गोयलच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सिया सासरच्या लोकांवर खूश होती…

सिया गोयलच्या वडिलांनी म्हटले की, ‘ही दुख:द घटना आहे. आमचा विश्वास बसत नाही. आम्ही केतनला आमचा मुलगा मानायचो. त्यांना आम्ही गमावलंय याचं दुख आहे. आम्हाला लग्नाच्या खूप अपेक्षा होत्या. काय काय स्वप्न सजवले होते. सियाचा वाढदिवस होता. आम्हाला महाबळेश्वरला जाऊन सेलिब्रेशन करायचं होतं. उदयपूरला लग्न करायचं होतं. बरीच स्वप्न होते. सियाही लग्नाबाबत भरभरून बोलायची. सासरच्या लोकांवर खूश होती. चांगला नवरा आणि घर मिळाल्याचं सांगत होती.’

आम्हाला अफेअरबद्दल माहिती असती तर…

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘सियाचं अफेयर असतं तर तिने सांगितलं असतं. तिने थोडं जरी सांगितलं असतं किंवा केतनच्या कुटुंबीयांनी सांगितलं असतं तर आम्ही तिच्याशी बोललो असतो. काही जरी कळलं असतं तर आम्ही बोललो असतो.सिया सिंपल होती. तिचं काही अफेयर होतं असं काही माहीत नव्हतं. जरा जरी माहीत असतं तर सियाला आम्ही दरडावलं असत. चेतन कुठून आला माहीत नाही. त्याला कधी भेटलो नाही. त्याचा चेहराही कधी पाहिला नाही. तो कधी घरी आला नाही, आम्ही कधी त्याचं नावही ऐकलं नाही. आम्ही केतनला गमावलं नाही. तर मुलालाच गमावलं आहे.’

नोव्हेंबरमध्ये होणार होते लग्न

केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा साखरपुडा काही महिन्यांपूर्वी झाला होता आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांचे लग्न होणार होते. यासाठीच्या तयारीलाही सुरुवात करण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच सिया आणि चेतनने केतनचा कट रचून खून केल्याचे समोर आले आहे. आता पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Follow Us
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?