AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेश पूजा असो वा सत्यनारायण, पंचामृताशिवाय देवाची उपासना अपूर्ण असते, त्याचे महत्त्व जाणून घ्या

कोणत्याही शुभ कार्यात, यज्ञात किंवा विधीमध्ये पंचामृताचा वापर करणे आवश्यक असते, जे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांपासून बनवले जाते.

गणेश पूजा असो वा सत्यनारायण, पंचामृताशिवाय देवाची उपासना अपूर्ण असते, त्याचे महत्त्व जाणून घ्या
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Mar 28, 2026 | 12:57 PM
Share

सनातन धर्मात पंचामृत अत्यंत पवित्र मानले जाते. पूजेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या पंचामृताचे विशेष महत्व असल्याने पूजेनंतर प्रसाद म्हणून भक्तांना दिले जाते. पंचामृत केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. शिवाय हिंदू धर्मग्रंथांमध्ये पंचामृताला अमृताच्या समकक्ष मानले आहे. त्यामुळे आजच्या लेखात आपण या पंचामृताचे महत्व काय आहे ते जाणून घेऊयात.

पंचामृताचे महत्त्व

पंचामृत हे पाच दिव्य तत्वांचे मिश्रण आहे, जे शरीराला शुद्ध करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते. असेही म्हटले जाते की पंचामृतातील पाच घटक आपल्या शरीरातील पाच घटकांना शुद्ध करण्याचे कार्य करतात. असा विश्वास आहे की पूजेच्या शेवटी सर्वांना पंचामृत प्रसाद म्हणून दिल्याने देवाचा आशीर्वाद भक्तांवर टिकून राहतो.

पाच तत्त्वे कशाचे प्रतीक आहेत?

दूध – पंचामृतातील दूध हा मुख्य घटक आहे. पंचामृतात सामान्यतः गाईच्या दुधाचा वापर केला जातो. पंचामृतातील दूध हे आत्म्याच्या पोषणाचे प्रतीक मानले जाते.

दही – पंचामृतामध्ये दही हा देखील एक महत्त्वाचा घटक असतो. दुधाप्रमाणेच दह्याला शुद्धता आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. आरोग्याच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, दही शरीरातील वात दोष कमी करण्यास मदत करते.

मध – औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेला मध पंचामृतातही वापरला जातो. मध हे चैतन्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

तूप – पंचामृतात समाविष्ट असलेले तूप गाईच्या दुधापासून बनवलेले असते. त्याच्या शुद्धतेसाठी आणि पौष्टिक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. अग्नी देवतेला पवित्र आहुती म्हणून तूप अर्पण केले जाते. अशाप्रकारे तूप हे दैवी कृपेचे प्रतीक आहे आणि शक्ती व विजयासाठी देवांकडून आशीर्वाद मिळवण्याचे ते प्रतीक आहे.

साखर – पंचामृतात वापरली जाणारी साखरही जीवनातील गोडवा, आनंद आणि सुखाचे प्रतीक मानली जाते.

तुम्हाला हे फायदे मिळतात

धार्मिक श्रद्धेनुसार पंचामृत देवाप्रती भक्ती वाढवण्यासही मदत करते. त्यात समाविष्ट असलेले पाच पवित्र पदार्थ शरीर आणि मनातील पंचमहाभूतांना (पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश) संतुलित करण्याचे कार्य करतात. पंचामृत अनेक औषधी गुणधर्मांनीही समृद्ध आहे, जे आयुर्वेदात विशेष महत्त्वाचे मानले जातात. शिवाय शिवपुराणानुसार देवदेवतांना पंचामृताने अभिषेक केल्याने आत्म्याचे शुद्धीकरण होते आणि मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.