AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti: चाणाक्य नितीनुसार ‘या’ चार सवयी माणसाला कधीच यशस्वी होऊ देत नाही?

चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की, मानवामध्ये अशा 4 वाईट सवयी आहेत, ज्या त्यांना यशस्वी होण्यापासून रोखतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 वाईट सवयी, ज्या माणसाने लगेच सोडणे आवश्यक आहेत.

Chanakya Neeti: चाणाक्य नितीनुसार 'या' चार सवयी माणसाला कधीच यशस्वी होऊ देत नाही?
चाणक्य नीती Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 19, 2023 | 3:58 PM
Share

मुंबई, जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने कठोर परिश्रम करतो. पण ते सगळेच यशस्वी होतत असं नाही. प्रयत्न करूनही अनेकांना निराशेला सामोरे जावे लागते. आयुष्यात काही गोष्टी किंवा चुका सफलतेमध्ये बाधा बनत असतात. आचार्य चाणक्य (Chanakya Neeti) यांनी या चुकांचे तपशीलवार वर्णन केले आहे. चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की, मानवामध्ये अशा 4 वाईट सवयी आहेत, ज्या त्यांना यशस्वी होण्यापासून रोखतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 वाईट सवयी, ज्या माणसाने लगेच सोडणे आवश्यक आहेत.

पैशांचा गैरवापर

चाणक्य नीतीनुसार, माणसाने त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशांचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे. जे इतरांचे नुकसान करण्यासाठी पैशाचा चुकीचा वापर करतात, त्यांची प्रतिमा ढोंगी अशी बनते. असे लोकं आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. माता लक्ष्मी देखील अशा लोकांपासून दूर जाते.

भेदभावाची सवय

आचार्य चाणक्य म्हणतात की, एखाद्या व्यक्तीमध्ये कधीही भेदभावाची भावना नसावी. अशी चुकीची विचारसरणी ठेवणारे लोकं आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. असे लोकं स्वतःच्या अहंकारात राहतात, ज्यामुळे इतर लोकं त्यांच्यापासून दूर राहतात. अशा लोकांना समाजात कधीच मान मिळत नाही.

वाईट आणि चुकीची संगत

चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, व्यक्तीने कधीही वाईट संगत करू नये. अशी संगत माणसाला वाईट आणि अधोगतीच्या मार्गावर घेऊन जाते. या चुकीच्या संगतीचा आजपर्यंत कोणालाच फायदा झालेला नाही. अशा सहवासामुळे, तो कुटुंब आणि मित्र आणि नातेवाईकांचा आधार देखील गमावतो.

राग आणि लोभ

आचार्य चाणक्य म्हणतात की, मनुष्याने लोभ आणि क्रोधापासून दूर राहिले पाहिजे. हे दोघे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. जे लोक या दोन वाईट सवयींकडे आकर्षित होतात, त्यांचे आयुष्य नरकापेक्षाही वाईट व्हायला वेळ लागत नाही. अशा लोकांपासून यश नेहमीच दूर पळते.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.