AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti: चाणाक्य नितीनुसार ‘या’ चार सवयी माणसाला कधीच यशस्वी होऊ देत नाही?

चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की, मानवामध्ये अशा 4 वाईट सवयी आहेत, ज्या त्यांना यशस्वी होण्यापासून रोखतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 वाईट सवयी, ज्या माणसाने लगेच सोडणे आवश्यक आहेत.

Chanakya Neeti: चाणाक्य नितीनुसार 'या' चार सवयी माणसाला कधीच यशस्वी होऊ देत नाही?
चाणक्य नीती Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 19, 2023 | 3:58 PM
Share

मुंबई, जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने कठोर परिश्रम करतो. पण ते सगळेच यशस्वी होतत असं नाही. प्रयत्न करूनही अनेकांना निराशेला सामोरे जावे लागते. आयुष्यात काही गोष्टी किंवा चुका सफलतेमध्ये बाधा बनत असतात. आचार्य चाणक्य (Chanakya Neeti) यांनी या चुकांचे तपशीलवार वर्णन केले आहे. चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की, मानवामध्ये अशा 4 वाईट सवयी आहेत, ज्या त्यांना यशस्वी होण्यापासून रोखतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 वाईट सवयी, ज्या माणसाने लगेच सोडणे आवश्यक आहेत.

पैशांचा गैरवापर

चाणक्य नीतीनुसार, माणसाने त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशांचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे. जे इतरांचे नुकसान करण्यासाठी पैशाचा चुकीचा वापर करतात, त्यांची प्रतिमा ढोंगी अशी बनते. असे लोकं आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. माता लक्ष्मी देखील अशा लोकांपासून दूर जाते.

भेदभावाची सवय

आचार्य चाणक्य म्हणतात की, एखाद्या व्यक्तीमध्ये कधीही भेदभावाची भावना नसावी. अशी चुकीची विचारसरणी ठेवणारे लोकं आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. असे लोकं स्वतःच्या अहंकारात राहतात, ज्यामुळे इतर लोकं त्यांच्यापासून दूर राहतात. अशा लोकांना समाजात कधीच मान मिळत नाही.

वाईट आणि चुकीची संगत

चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, व्यक्तीने कधीही वाईट संगत करू नये. अशी संगत माणसाला वाईट आणि अधोगतीच्या मार्गावर घेऊन जाते. या चुकीच्या संगतीचा आजपर्यंत कोणालाच फायदा झालेला नाही. अशा सहवासामुळे, तो कुटुंब आणि मित्र आणि नातेवाईकांचा आधार देखील गमावतो.

राग आणि लोभ

आचार्य चाणक्य म्हणतात की, मनुष्याने लोभ आणि क्रोधापासून दूर राहिले पाहिजे. हे दोघे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. जे लोक या दोन वाईट सवयींकडे आकर्षित होतात, त्यांचे आयुष्य नरकापेक्षाही वाईट व्हायला वेळ लागत नाही. अशा लोकांपासून यश नेहमीच दूर पळते.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी