AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti: चाणाक्य नितीनुसार ‘या’ चार सवयी माणसाला कधीच यशस्वी होऊ देत नाही?

चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की, मानवामध्ये अशा 4 वाईट सवयी आहेत, ज्या त्यांना यशस्वी होण्यापासून रोखतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 वाईट सवयी, ज्या माणसाने लगेच सोडणे आवश्यक आहेत.

Chanakya Neeti: चाणाक्य नितीनुसार 'या' चार सवयी माणसाला कधीच यशस्वी होऊ देत नाही?
चाणक्य नीती Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 19, 2023 | 3:58 PM
Share

मुंबई, जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने कठोर परिश्रम करतो. पण ते सगळेच यशस्वी होतत असं नाही. प्रयत्न करूनही अनेकांना निराशेला सामोरे जावे लागते. आयुष्यात काही गोष्टी किंवा चुका सफलतेमध्ये बाधा बनत असतात. आचार्य चाणक्य (Chanakya Neeti) यांनी या चुकांचे तपशीलवार वर्णन केले आहे. चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की, मानवामध्ये अशा 4 वाईट सवयी आहेत, ज्या त्यांना यशस्वी होण्यापासून रोखतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 वाईट सवयी, ज्या माणसाने लगेच सोडणे आवश्यक आहेत.

पैशांचा गैरवापर

चाणक्य नीतीनुसार, माणसाने त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशांचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे. जे इतरांचे नुकसान करण्यासाठी पैशाचा चुकीचा वापर करतात, त्यांची प्रतिमा ढोंगी अशी बनते. असे लोकं आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. माता लक्ष्मी देखील अशा लोकांपासून दूर जाते.

भेदभावाची सवय

आचार्य चाणक्य म्हणतात की, एखाद्या व्यक्तीमध्ये कधीही भेदभावाची भावना नसावी. अशी चुकीची विचारसरणी ठेवणारे लोकं आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. असे लोकं स्वतःच्या अहंकारात राहतात, ज्यामुळे इतर लोकं त्यांच्यापासून दूर राहतात. अशा लोकांना समाजात कधीच मान मिळत नाही.

वाईट आणि चुकीची संगत

चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, व्यक्तीने कधीही वाईट संगत करू नये. अशी संगत माणसाला वाईट आणि अधोगतीच्या मार्गावर घेऊन जाते. या चुकीच्या संगतीचा आजपर्यंत कोणालाच फायदा झालेला नाही. अशा सहवासामुळे, तो कुटुंब आणि मित्र आणि नातेवाईकांचा आधार देखील गमावतो.

राग आणि लोभ

आचार्य चाणक्य म्हणतात की, मनुष्याने लोभ आणि क्रोधापासून दूर राहिले पाहिजे. हे दोघे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. जे लोक या दोन वाईट सवयींकडे आकर्षित होतात, त्यांचे आयुष्य नरकापेक्षाही वाईट व्हायला वेळ लागत नाही. अशा लोकांपासून यश नेहमीच दूर पळते.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.