AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

18 ऑगस्टपासून या तीन राशींचं नशिब पालटणार! शुक्राची स्थिती तयार करणार अनुकूल परिस्थिती

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती राशीचक्रावर परिणाम करत असते. प्रत्येक ग्रह त्या त्या स्थितीनुसार फळ देत असतं. शुक्र ग्रह 18 ऑगस्टपासून वेगळ्या स्थितीत असणार आहे. तीन राशींना याचा लाभ मिळणार आहे.

18 ऑगस्टपासून या तीन राशींचं नशिब पालटणार! शुक्राची स्थिती तयार करणार अनुकूल परिस्थिती
शुक्र गोचर
| Updated on: Aug 09, 2023 | 8:47 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची स्थिती राशीचक्रावर आपला प्रभाव पाडत असते. त्या त्या ग्रहानुसार राशीचक्राचा अभ्यास केला जातो. काही ग्रह अनुकूल तर काही ग्रह प्रतिकूल परिस्थितीत असतात. त्यामुळे प्रत्येक ग्रह राशीचक्रावर वेगवेगळा प्रभाव पाडत असतो. सध्या शुक्र ग्रह कर्क राशीत असून अस्ताला गेलेला आहे. पण 18 ऑगस्टला सकाळी 3 वाजून 20 मिनिटांनी कर्क राशीत उदय होणार आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबरला कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे तीन राशीच्या जातकांना धनलाभ होऊ शकतो. तसेच नशिबाची चांगली साथ या काळात मिळणार आहे.

या तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ

कर्क : शुक्र ग्रहाची स्थिती या राशीच्या जातकांना फलदायी ठरणार आहे. कारण या राशीच्या लग्नभावात शुक्राचा उदय होणार आहे. लग्नभाव हा आत्मविश्वासाशी निगडीत आहे. त्यामुळे एक वेगळाच बदल दिसून येईल. आपल्या प्रतिमेची छाप समोरच्या व्यक्तीवर पडेल. तुमच्या वाणीने समोरची व्यक्तीला भूरळ पडेल. तसेच न होणारी कामंही होतील अशी स्थिती आहे. या कालावधीत एकाग्रता वाढण्यास मदत होईल. वैवाहिक जीवन आनंदात जाईल.

मकर : या राशीच्या सप्तम भावात शुक्र ग्रहाचा उदय होणार आहे. हे स्थान जोडीदार आणि पार्टनरशिपशी निगडीत आहे. त्यामुळे पार्टनरशिपच्या धंद्यात चांगलं यश मिळेल. काही अडचणी असतील तर त्या या काळात दूर होतील. विवाहित लोकांना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नातं एकदम घट्ट होईल अशी स्थिती आहे. नशिबाची चांगली साथ या काळात मिळेल. तसेच अडकलेली कामं या काळात पूर्ण होतील.

मीन : या राशीच्या चतुर्थ स्थानात शुक्र उदीत होणार आहे. त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. भौतिक सुखांची प्राप्ती या काळात होईल. वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीचा योग जुळून येईल. वडिलोपार्जित जमिनीतून चांगला फायदा मिळू शकतो. जे लोक प्रॉपर्टी, रियल इस्टेटशी निगडीत व्यवसाय करतात त्यांना या काळात चांगला फायदा होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.