AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाग्यवान लोकांच्या हातावर बनते V चिन्ह, जीवनात गाठतात मोठी उंची

ज्या लोकांच्या तळहातावर हे 'V' चिन्ह असते, ते भाग्यवान तर असतातच पण त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांना चांगले मार्गदर्शक भेटतात. अशा लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये क्वचितच नकारात्मकता दिसून येते.

भाग्यवान लोकांच्या हातावर बनते V चिन्ह, जीवनात गाठतात मोठी उंची
हातावर V चिन्हImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 22, 2023 | 4:52 PM
Share

मुंबई : इंग्रजीत व्ही फॉर व्हिक्टरी मानली जाते, तर हस्तरेखा शास्त्रही (Palmistry Marathi) सांगते की हातात व्ही चिन्ह असेल तर तुम्हाला जीवनाची लढाई जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तळहातावर या चिन्हाची उपस्थिती तरुण वयात तुमच्या जीवनात अफाट संपत्ती आणि यश दर्शवते. असे लोकं स्वभावानेही खूप आनंदी मानले जातात. चला जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित आणखी काही खास गोष्टी.

तळहातावर ‘V’ चिन्हाचा अर्थ काय?

ज्या लोकांच्या तळहातावर हे ‘V’ चिन्ह असते, ते भाग्यवान तर असतातच पण त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांना चांगले मार्गदर्शक भेटतात. अशा लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये क्वचितच नकारात्मकता दिसून येते. या लोकांना विश्वासू आणि समजूतदार जोडीदार मिळण्याची शक्यताही खूप जास्त असते.

जीवनातील चढ-उतारांवर मात करण्यासाठी अनेकदा लोकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त लोकांची गरज असते. ज्या लोकांच्या तळहातावर ‘V’ चिन्ह असते त्यांच्यावर वाईट काळात विश्वास ठेवला जाऊ शकतो. अशी माणसे वाईट वेळ आल्यास मदत करायला सदैव तत्पर असतात. अशा लोकांवर तुम्ही नेहमी आंधळेपणाने विश्वास ठेवू शकता.

मात्र, ‘व्ही’ मार्क असलेल्या सर्वच व्यक्तींना समाजात असा सन्मान आणि प्रेम मिळत नाही, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर या लोकांना खूप संघर्ष करावा लागतो. सुरुवातीला त्यांना मोठ्या आव्हानांनाही सामोरे जावे लागते. 35 वर्षांनंतर या लोकांच्या आयुष्यात चांगले बदल येऊ लागतात. करिअर, व्यवसाय किंवा नोकरीच्या बाबतीत ते वेगाने प्रगती करतात.

तळहातावर V चिन्ह कुठे असावे?

ज्या लोकांच्या तळहातावर तर्जनी आणि मधले बोट यांच्यामध्ये V चिन्ह असते, त्यांना खूप भाग्यवान मानले जाते. अशा लोकांची विचारसरणी खूप सकारात्मक असते आणि ते कधीही कशावरही घाबरत नाहीत आणि वाईट काळाला ते खंबीरपणे सामोरे जातात.

कौटुंबिक बाबतीतही भाग्यवान

ज्या लोकांच्या हातात V’ चिन्ह असते, अशा लोकांना एक सुंदर कुटुंब मिळते. अशा लोकांना कुटुंबात नेहमीच प्रेम आणि आदर असतो. परस्पर सामंजस्य टिकून राहते आणि प्रत्येकजण कठीण प्रसंगी एकमेकांना साथ देतो. असे लोकं स्वभावानेही खूप दयाळू असतात आणि प्रत्येक सुख-दु:खात आपल्या मित्रपरिवाराला साथ देतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.