AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs | या 4 राशीच्या लोकांना कधीच राग येत नाही, स्वभावाने असतात कूल

राग हा माणसाचा दोष मानला जातो. रागावलेला माणूस अनेकदा चुकीचे निर्णय घेतो आणि त्याचे आयुष्य संकटात टाकतो. त्याच वेळी, काही लोक इतके मनमौजी असतात की त्यांना कोणी काहीही सांगितले तरी ते फारसे गांभीर्याने घेत नाहीत. असे लोक फक्त त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करतात आणि जीवनात मोठ्या गोष्टी साध्य करतात.

Zodiac Signs | या 4 राशीच्या लोकांना कधीच राग येत नाही,  स्वभावाने असतात कूल
Zodiac
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 7:52 AM
Share

मुंबई : राग हा माणसाचा दोष मानला जातो. रागावलेला माणूस अनेकदा चुकीचे निर्णय घेतो आणि त्याचे आयुष्य संकटात टाकतो. त्याच वेळी, काही लोक इतके मनमौजी असतात की त्यांना कोणी काहीही सांगितले तरी ते फारसे गांभीर्याने घेत नाहीत. असे लोक फक्त त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करतात आणि जीवनात मोठ्या गोष्टी साध्य करतात. अशी माणसे सर्वांनाच आवडतात. ज्योतिषशास्त्रानुसार राग येणे किंवा न येणे इत्यादी सर्व गुण आणि अवगुण माणसाला जन्मापासूनच प्राप्त होतात.

व्यक्तीचे नक्षत्र, ग्रहस्थिती, राशी इत्यादींचाही व्यक्तीच्या स्वभावावर परिणाम होतो. ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती बदलत राहते, परंतु राशीचक्र आयुष्यभर व्यक्तीसोबत राहाते. प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो, अशा स्थितीत राशीच्या स्वामीच्या स्वभावाचा प्रभाव आयुष्यभर संबंधित व्यक्तीवर राहतो. ज्योतिष शास्त्रानुसार, काही राशींना लवकर राग येत नाही. ते खूप मनमौजी मानले असतात.

मिथुन

हे लोक खूप शांत असतात. त्यांच्यात बोलण्याचा विशेष गुण असतो. ते त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीने कोणाचंही मनं जिंकतात. यासोबतच इतरांचा राग शांत करण्याची क्षमताही त्यांच्यात असते. या लोकांना आयुष्य अगदी साधेपणाने जगायला आवडते. मात्र, काही वेळा ते त्यांच्या स्वभावाविरुद्ध वागतात, त्यामुळे त्यांना नुकसानही सहन करावे लागते.

कर्क

कर्क राशीला चंद्र राशी म्हणतात. चंद्राचा स्वभाव अतिशय थंड आणि सौम्य असतो, अशा स्थितीत हे लोकही खूप शांत असतात. हे लोक अनेकवेळा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असले तरी जलतत्त्वाचे प्रमाण असल्याने ते कोणत्याही परिस्थितीत लवकर रागवत नाहीत. त्यांच्या स्वभावामुळे ते कुठेही सहज स्थान निर्माण करतात.

कन्या

कन्या राशीच्या लोकांना थोडा राग येतो, पण ते पटकन राग व्यक्त करत नाहीत. ते असे दाखवतात की त्यांना काहीही फरक पडलेला नाहीये. हे लोक जीवनात आनंदाने भरलेले असतात आणि अतिशय व्यावहारिक असतात.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांचे वागणे लोकांशी खूप प्रेमळ असते, त्यामुळे लोकांना ते खूप आवडतात. त्यांना लवकर राग येत नाही. कुंभ राशीच्या लोकांना इतरांना मदत करायला आवडते. त्याला आपले जीवन तत्त्वांनुसार जगणे आवडते. ही तत्त्वे केवळ त्यांच्यासाठी असली तरी ती इतर कोणावरही लादत नाहीत. पण जर कोणी त्याचा स्वाभिमान दुखावला तर ते अत्यंत क्रोधित होतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac signs | लॉयल पार्टनरच्या शोधात आहात, मग या राशींच्या लोकांचा नक्की विचार करा

Zodiac signs | मजा मस्ती करायची आहे मग या 3 राशींच्या लोकांसोबत राहाच

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...