AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

18 वर्षानंतर मीन राशीत सूर्याला राहु पकडणार कोंडीत, या राशींनी जरा सांभाळूनच

सूर्य आणि राहुचं एकमेकांशी पटत नाही. कारण हे दोन्ही ग्रह एकत्र आले की ग्रहण योग लागतो. त्यामुळे त्यांच्या युतीचा राशीचक्रावर विपरीत परिणाम होतो. असं असताना 18 वर्षानंतर गुरुच्या मीन राशीत हे दोन ग्रह एकत्र येणार आहेत. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम होईल.

18 वर्षानंतर मीन राशीत सूर्याला राहु पकडणार कोंडीत, या राशींनी जरा सांभाळूनच
18 वर्षानंतर मीन राशीत राहुच्या तावडीत सापडला सूर्य, राशीचक्रात होणार अशी उलथापालथ
| Updated on: Feb 02, 2024 | 3:12 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात राहु-केतु यांना पापग्रहांचा दर्जा देण्यात आला आहे. हे दोन्ही ज्या ग्रहांसोबत एकत्र त्यांचा गुण नाही पण वाण लागतो. त्यामुळे ते ग्रह तशीच फळं देतात. सध्या राहु ग्रह हा दीड वर्षांसाठी मीन राशीत विराजमान आहे. त्यामुळे संपूर्ण राशीचक्र फिरून एका राशीत येण्यासाठी 18 वर्षांचा कालावधी लागतो. आता राहु मीन राशीत असून 14 मार्च रोजी सूर्य या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे एका महिन्यासाठी दोन्ही ग्रहांची युती होणार आहे. 14 मार्च रोजी दुपारी 12 वाजून 46 मिनिटांनी सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. 13 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल आणि ग्रहण योग सुटेल. या दरम्यान चंद्रग्रहण देखील होणार आहेय. 25 मार्चला धुळीवंदन या दिवशी ग्रहण लागेल. पण हे भारतातून दिसणार नसल्याने वैदीक नियम पाळण्याची गरज नाही. एकंदरीत एक महिन्याचा कालावधी काही राशींसाठी डोकेदुखी ठरणार आहे. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या ते..

वृषभ : या राशीच्या एकादश भावात दोन ग्रह एकत्र येणार आहेत. त्यामुले काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही कामं होता होता राहतील.कामाच्या ठिकाणीही बॉसकडून नकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. वैयक्तिक आयुष्यातही काही संकट एकामागून एक येतील. आपल्या बोलण्यामुळे नातेसंबंध दूरवण्याची शक्यता आहे. मुलांकडूनही अपेक्षित सहकार्य मिळणार नाही.

सिंह : या राशीच्या षष्टम स्थानात दोन ग्रहांच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होत आहे. त्यामुळे निर्णय क्षमतेत उणीव दिसून येईल. आत्मविश्वास कमी झाल्याचं जाणवेल. काही निर्णय या कालावधीत चुकू शकतात. त्यामुळे बॅकफूटवर जाण्याची वेळ येईल. उद्योगधंद्यातही काही तोटा सहन करावा लागू शकतो. भागीदारीच्या धंद्यात अपेक्षित यश मिळणार नाही. तसेच भांडणं होण्याची शक्यता आहे.

मकर : या राशीच्या तिसऱ्या स्थानात सूर्य राहुची युती होत आहे. काही कौटुंबिक कारणामुळे जीव अस्वस्थ होईल. काय करू आणि काय नको असं होईल. एखादा निर्णय घेताना एक आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण होईल. व्यवसायात जोखिम न घेतलेली बरी राहील. कारण ग्रहमान या कालावधीत हवं तसं नाही. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.