Sadesati Tips : शनिच्या साडेसातीत का करावा लागतो मानसिक आणि आर्थिक समस्यांचा सामना, असा असतो साडेसातीचा प्रवास
शनिला 12 राशीतून प्रवास करण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागतात आणि तो अडीच वर्षाच्या तीन टप्प्यांमध्ये राशी बदलतो. यामुळे काही लोकांच्या राशीत शनीची साडेसाती (Sadesati Tips) आणि अडीचकी निर्माण होतात.

मुंबई : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायदेवता म्हणून पूजले जाते. पण कधी कधी काही लोकांना शनिदेवाच्या प्रकोपाचाही सामना करावा लागतो. शनी खूप हळू राशी बदलतो. त्याला 12 राशीतून प्रवास करण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागतात आणि तो अडीच वर्षाच्या तीन टप्प्यांमध्ये राशी बदलतो. यामुळे काही लोकांच्या राशीत शनीची साडेसाती (Sadesati Tips) आणि अडीचकी निर्माण होतात. साडेसातीच्या काळात व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. यासोबतच ज्योतिषशास्त्रात काही चुका सांगितल्या आहेत, ज्याची पुनरावृत्ती केल्याने व्यक्तीला शनिदेवाच्या अशुभ प्रभावांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी ज्या लोकांचे जीवन शनि साडेसातीच्या अंधारात चालले आहे, त्यांनी काही खास उपाय करावेत. चला जाणून घेऊ शनिदेवाला प्रसन्न करण्याचे काही सोपे उपाय.
शनीची साडेसाती दूर करण्याचे सोपे उपाय
- शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी लोखंड, काळे तीळ, काळी उडीद डाळ किंवा काळे कापड दान करावे. असे केल्याने व्यक्तीला फायदा होतो.
- यासोबतच शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि शनि स्तोत्राचे पठण करा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.
- शनिदेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शनिवारी शनि मंदिरात जाऊन मोहरीचे तेल काळे तीळ मिसळून शनिदेवाला लोखंडी खिळे अर्पण करा.
- हनुमानजींची पूजा करूनही शनिदेव शांत होतात. म्हणूनच दररोज हनुमान चालिसाचा पाठ करा. यासोबतच पक्ष्याला दररोज अन्न व पाणी द्यावे.
- शनिवारशी संबंधित काही युक्त्या देखील ज्योतिषशास्त्रात वर्णन केल्या आहेत. उदाहरणार्थ, शनिवारी मासे, पक्षी आणि प्राण्यांना खायला दिल्याने शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो.
- यासोबतच रोज एखाद्या गरजू किंवा असहाय व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार मदत केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर करतात.
- ज्या राशींवर शनीचा साडेसातीचा प्रकोप चालू आहे. त्याला काही दिवस मांस आणि मद्यपान सोडावे, तसेच जाणूनबुजून किंवा नकळत कोणालाही त्रास देऊ नये. असे केल्याने शनीचा अशुभ प्रभाव वाढू शकतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
