AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shukra Gochar: 15 फेब्रुवारीपासून तीन राशींना शुक्र देणार साथ, कशी असेल स्थिती वाचा

Shukra Grah Gochar 2023: राशीमंडळात ग्रहांचं गोचर सुरुच असतं. कधी या राशीत तर कधी त्या राशीत असं भ्रमण सुरु असतं. या गोचरामुळे मानवी जीवनावर परिणाम दिसत असतो. आता प्रसिद्धीकारक शुक्र ग्रह 15 फेब्रुवारीला गोचर करणार आहे.

Shukra Gochar: 15 फेब्रुवारीपासून तीन राशींना शुक्र देणार साथ, कशी असेल स्थिती वाचा
प्रसिद्धीकारक शुक्र ग्रह करणार गोचर, तीन राशींना मिळणार नशिबाची साथ
| Updated on: Feb 07, 2023 | 9:10 PM
Share

मुंबई: ज्योतिषशास्त्रात शनि (Shani), गुरु (Guru) आणि बुध (Budh) या महत्त्वांच्या ग्रहांसह शुक्राकडेही नजर लागून असते. कारण शुक्र (Shukra) हा ग्रह प्रसिद्धीचा कारक ग्रह आहे. चंद्र आणि बुधानंतर शुक्र हा सर्वात वेगाने राशी बदलणारा ग्रह आहे. 15 फेब्रुवारी 2023 रोजी शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत गुरु ग्रह वर्षाभरासाठी ठाण मांडून आहे. तर शुक्र ग्रह 12 मार्चपर्यंत असणार आहे. त्यामुळे गुरु शुक्र युती होणार आहे. तर गुरु ग्रह हा धर्म, ज्ञान आणि अध्यात्म्याशी निगडीत ग्रह आहे. गुरु शुक्राच्या युतीमुळे मीन राशीत मालव्य राजयोग तयार होत आहे. मालव्य राजयोग हा अत्यंत शुभ योग मानला जातो. या योगामुळे अडकलेली कामं पूर्ण होतात. तसेच ज्या कामात हात घालू ते काम पूर्णत्वास येतं.या मालव्य राजयोगाचा फायदा तीन राशींना होणार आहे. 15 फेब्रुवारी ते 12 मार्च 2023 असा 26 दिवस या योगाचा लाभ मिळणार आहे.

मिथुन (Mithun)- या राशीच्या जातकांना शुक्र गोचराचा सर्वाधिक फायदा होणार आहे. शुक्र ग्रहामुळे प्रॉपर्टी खरेदीचा योग जुळून येणार आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामंही मार्गी लागतील. विदेश यात्रा, घरात लक्झरी वस्तू घेण्याचा योग आहे.व्यवसायिकांना या काळात मोठा लाभ दर्शवत आहे. तसेच लाभदायी करारही निश्चित होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात आनंदाचं वातावरण असेल. तसेच जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल.

धनु (Dhanu)- या राशीच्या जातकांची नुकतीच साडेसातीतून सुटका झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून त्रासात असलेल्या धनु राशीच्या जातकांना शुक्र-गुरु युतीचा फायदा होणार आहे. मालव्य राजयोगामुळे जातकांना खूशखबर मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुकाचा वर्षाव या काळात होईल. तसेच पदोन्नती आणि पगार वाढीची शक्यता दाट आहे. व्यवसायिकांना व्यापार वाढीसाठी हा काळ अनुकूल आहे. जोडीदारासोबत बाहेरगावी फिरण्याचा योग असून कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मीन (Meen)- या राशीचा स्वामी गुरु असून या राशीत दोन ग्रहांची युती होत आहे. साडेसातीचा पहिला टप्पा असला तरी काही काळ दिलासा मिळणार आहे. शुक्राच्या आगमनाने नोकरीत बढतीची शक्यता आहे. तसेच समाजात मानसन्मान देखील वाढणार आहे. विदेश यात्रा करण्याचा योग जुळून येईल. त्याचबरोबर व्यवसायासाठी मोठी गुंतवणूक मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरी करण्यासाठी या काळात चांगली संधी मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.