AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan 2025 : मार्च ऐंडला ‘या’ तीन राशींचं टेंशन वाढवणार; नोकरी, प्रेम आणि करिअरला लागणार ग्रहण

Surya Grahan Effect On Zodiac Signs : मार्च महिन्याच्या अखेरीस या वर्षाचं पहिलं सूर्य ग्रहण लागणार आहे. हा काळ काही राशींना अनुकूल ठरणार आहे. तर काही राशींसाठी हे ग्रहण दिवाळं काढणारं असणार आहे. तुमच्या राशीवर या सूर्य ग्रहणाचा नेमका काय परिणाम होणार? जाणून घेऊया..

Surya Grahan 2025 : मार्च ऐंडला 'या' तीन राशींचं टेंशन वाढवणार; नोकरी, प्रेम आणि करिअरला लागणार ग्रहण
Surya GrahanImage Credit source: tv9 Marathi
राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Mar 11, 2025 | 3:30 PM
Share

यंदाच्या वर्षीच पहिलं सूर्यग्रहण मार्च महिन्यात 29 तारखेला लागणार आहे. शनिवारी येणाऱ्या या सूर्य ग्राहणामुळे काही राशींना फायदा होणार आहे. तर काही राशींवर याचा वाईट परिणाम होताना दिसणार आहे. प्रेमसंबंध, करिअर, नोकरीत या राशींना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. एकीकडे मकर राशीची साडेसाती संपणार आहे. तर दुसरीकडे काही राशींना हा काळ समस्यांनी भरलेला असणार आहे. त्यामुळे अडचणींचं ग्रहणच या राशीच्या लोकांना लागणार आहे.

शनिवारी 29 मार्च 2025 रोजी दुपारी 2.20 मिनिटांनी सूर्य ग्रहण लागणार आहे. तर संध्याकाळी 6.16 मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे. म्हणजे एकूण 2 तास 53 मिनिटांचं हे ग्रहण असणार आहे. या काळात ज्योतिषशास्त्रानुसार तीन राशींच्या आयुष्यात चांगलीच उलथापालथ होणार आहे. या राशींना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

सूर्यग्रहणाचा परिणाम होणाऱ्या राशी कोणत्या..

मेष रास

मेष राशीच्या लोकांवर सूर्य ग्रहणाचा वाईट परिणाम होणार आहे. या काळात मेष राशीच्या लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जॉब आणि करिअरमध्ये देखील समस्या येऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागेल. प्रेमात असलेल्यांना जोडीदाराशी वाद झाल्याने नातेसंबंधांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुद्धा वाद निर्माण होऊ शकतात.

कर्क रास

वर्षाच्या पहिल्याच सूर्यग्रहणानंतर कर्क राशीच्या लोकांच्या करिअर आणि नोकरीत अडचणी येण्याची शक्यता आहे. व्यवसायात व्यवहार जपून करावे. पैसे अडकून पडू शकतात. त्यामुळे तुम्ही चिंतेत राहाल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी मधुर संबंध ठेवण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही वादात अडकू नका.

मीन रास

या राशीच्या लोकांना सूर्यग्रहण काळात अनेक अडचणीना तोंड द्यावं लागेल. ज्यामुळे चिडचिड होईल. डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. नोकरीत वरिष्ठांशी संबंध बिघडू शकतात. विवाहेच्छुकांचे विवाह जुळण्यात अडचणी येतील. ताक देखील फुंकुन प्यावे अशी स्थिती नात्यात असेल. घाई करू नका.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप