AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valentine Day: नात्याला बनवायचे असेल अधीक घट्ट तर ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी करा हे खास वास्तू उपाय

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी वास्तूनुसार (Vastu Tips) काही उपाय केल्यास वैवाहिक जीवनात गोडवा येईल आणि नातेसंबंध मजबूत होतील. चला काही वास्तू शास्त्रातल्या उपायांबद्दल जाऊया.

Valentine Day: नात्याला बनवायचे असेल अधीक घट्ट तर 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी करा हे खास वास्तू उपाय
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 14, 2023 | 6:15 PM
Share

मुंबई, आज 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साजरा केला जात आहे. या दिवशी जोडपे एकमेकांसाठी भेटवस्तू खरेदी करतात. या सर्व भेटवस्तू अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी जोडपे एकमेकांना सुंदर भेटवस्तू देतात आणि हा दिवस खास बनवतात. व्हॅलेंटाईन डे केवळ अविवाहित जोडप्यांकडूनच नव्हे तर विवाहित लोकही साजरा करतात. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी वास्तूनुसार (Vastu Tips) काही उपाय केल्यास वैवाहिक जीवनात गोडवा येईल आणि नातेसंबंध मजबूत होतील. चला काही वास्तू शास्त्रातल्या उपायांबद्दल जाऊया.

‘व्हॅलेंटाईन डे’साठी वास्तु उपाय

  • जर तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या नात्यात कधीही कटुता आणायची नसेल, तर तुम्ही कॅक्टस सारखी काटेरी झाडे कधीही लावू नका.
  • वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सुखी बनवायचे असेल तर तुम्ही तुमच्या घरात शिंपले आणि शंख ठेवावे.
  • प्रेमसंबंध मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये लाफिंग बुद्ध, लव्ह बर्ड्स इत्यादी ठेवू शकता, यामुळे तुमच्या नात्यात सुसंवाद राहतो.
  • शास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या जीवनात प्रणय कायम ठेवायचा असेल, तर चुकूनही कधीही जास्त जुने सामान घरात ठेवू नका, घरातील रद्दी वस्तू वेळोवेळी बाहेर काढा.
  • तुमच्या आयुष्यातील प्रेमसंबंध सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये निळ्या रंगाचे फेंगशुई फुलपाखरू ठेवू शकता, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
  • अशाप्रकारे, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुमचे प्रेमसंबंध सुधारण्यासाठी वास्तूने सुचवलेल्या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या नात्यातील प्रेम आणि सहकार्याची भावना नक्कीच वाढवू शकता.
  • तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही कधीही आग्नेय दिशेला असलेल्या खोलीत राहू नये. ते तुमच्या नात्यासाठी हानिकारक आहे. या दिशेच्या खोलीत राहिल्याने तुमच्या नात्यात तणाव निर्माण होईल.
  •  तुमच्या बेडरूममध्ये हलके रंग वापरा. अनावश्यक वस्तूंनी खोली भरू नका. असे केल्यास त्या खोलीत राहणाऱ्या लोकांमध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते.
  • विवाहित जोडप्याने त्यांच्या खोलीत नैर्ऋत्य दिशेला एकत्र फोटो लावावा. एका कोपऱ्यात स्फटिक बॉल्सच्या जोडांमध्ये फोटो ठेवणं उत्तम. असं केल्याने नातं मधुर राहतं.
  • घराच्या प्रमुखाची खोली नैर्ऋत्य दिशेला असावी. अशा खोलीत राहिल्याने नाते चांगले राहते.
  • तुम्ही ज्या पलंगावर झोपता तो लाकडाचा असावा आणि तो चौकोनी असावा. झोपताना तुमचे डोके दक्षिणेला आणि पाय उत्तरेकडे असावेत. अशी परिस्थिती नात्यासाठी चांगली असते. खराब डिझाइन केलेले बेड तणाव निर्माण करतात.
  • जर तुमच्या खोलीत एखादा आरसा असेल, ज्यामध्ये झोपताना पती-पत्नीचा चेहरा दिसत असेल तर ते तुमच्या नात्यासाठी चांगले नाही. आरसा झाकून ठेवा.
  • वैवाहिक जीवनात बेडरूममध्ये सजावटीच्या वस्तू जोडीने ठेवाव्यात. बेडरूममध्ये टीव्ही किंवा कॉम्प्युटर ठेवू नका, ते वास्तूला अनुरूप नाही.
  • बेडरूममध्ये तुमचा पलंग दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवा. पलंग शक्यतो एका पीसचा असावा. दोन वेगळे भाग जोडून बेड बनवू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.