AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार जेवण करतांना या चुका टाळा, माता लक्ष्मी होते नाराज

माणूस अन्नासाठी रात्रंदिवस काम करतो. अन्नाला सगळ्याच धर्मात सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. अन्नाशी संबंधीत अनेक नियम शास्त्रात सांगितले आहे.

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार जेवण करतांना या चुका टाळा, माता लक्ष्मी होते नाराज
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 08, 2023 | 8:31 PM
Share

मुंबई : वास्तुशास्त्रामध्ये (Vastu Tips) प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही नियम बनवलेले आहेत, ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तूशास्त्रात जेवण्याच्या पद्धती आणि काही नियम देखील सांगितले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास आरोग्य बिघडू शकते. यामुळे देवी लक्ष्मी देखील कोपते आणि व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. जाणून घ्या अन्नाशी संबंधित वास्तूचे हे नियम.

जेवणाशी संबंधित या चुका टाळा

  • जेवताना दिशेची काळजी घेतली पाहिजे. वास्तु नियमानुसार दक्षिण दिशेला तोंड करून अन्न कधीही जेवू नये. ही यमाची दिशा मानली जाते. या दिशेला तोंड करून जेवल्याने आयुर्मान कमी होते. दुसरीकडे, पश्चिम दिशेला तोंड करून जेवल्याने तुमचे आरोग्य बिघडते.
  • नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जेवावे. या दोन्ही दिशांना देव दिशा मानले जाते. या दिशेला तोंड करून अन्न खाल्ल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि आरोग्यही चांगले राहते.
  • बूट घालून किंवा डोके झाकून कधीही जेवू नका. हा अन्नाचा अपमान मानला जातो. पलंगावर बसून कधीही जेवू नये. त्यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होतात आणि व्यक्तीवर कर्ज वाढते.
  • अंघोळ केल्याशिवाय कधीही जेवू नये. आंघोळ केल्यावर नेहमी स्वच्छ कपडे घालूनच जेवावे. यामुळे लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी या दोघीही प्रसन्न राहतात, असे मानले जाते.
  •  कधीही तुटलेल्या भांड्यात किंवा हातात ताट धरून जेवू नये. वास्तूनुसार जेवण्याची उत्तम जागा म्हणजे स्वयंपाकघर किंवा त्याच्या आजूबाजूची जागा. नैसर्गिक प्रकाश आणि शुद्ध हवा सतत येत राहते अशा ठिकाणी जेवावे.
  • नेहमी शांत आणि आनंददायी वातावरणात जेवले पाहिजे. जितकी भूक आहे तितकेच अन्न ताटात घ्यावे. उष्टे अन्न टाकल्याने अन्नाचा अपमान होतो. त्यामुळे घरात पैसा आणि अन्नधान्याची चणचण भासते.
  • वास्तुशास्त्रात अन्नग्रहण करण्याची शुभ वेळ म्हणजे सकाळी सूर्योदयानंतर आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी. यावेळी जेवल्याने सहज पचते आणि आरोग्य चांगले राहते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.