AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2025 Sharad Purnima : शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी निमित्त परमपूज्य महंत स्वामी महाराजांनी दिला आशिर्वाद

हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेचे खूप महत्व आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो, काही ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा रास पौर्णिमा असंही म्हटलं जातं.

2025 Sharad Purnima : शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी निमित्त परमपूज्य महंत स्वामी महाराजांनी दिला आशिर्वाद
| Updated on: Oct 06, 2025 | 2:56 PM
Share

हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेचे खूप महत्व आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो, काही ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा रास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. धार्मिक श्रद्धेनुसार वर्षातील ही एकमेव रात्र अशी असते जेव्हा चंद्र त्याच्या पूर्ण तेजात असतो आणि त्याची किरणे अमृतासारख्या दैवी औषधी गुणधर्मांनी भरलेली आपल्यावर वर्षाव करतात. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करते आणि जागृत राहून तिची पूजा करणाऱ्या भक्तांवर तिचे विशेष आशीर्वाद वर्षाव करते असे मानले जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लोक विविध पूजा विधी करतात.

धार्मिक मान्यतेनुसार, कोजागिरी अर्थात शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. असे मानले जाते की या तिथीला रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर किंवा दूध अमृतासारखे बनते.या दिवशी बहुतांश ठिकाणी लोकं खीर किंवा आटवलेलं, केशर घातलेलं दूध तयार करून त्याचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर ते दूध प्राशन करतात.

परमपूज्य महंत स्वामी महाराजांचे आशीर्वाद |

शरद पौर्णिमा शरद पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी, हा उत्सव परमपूज्य महंत स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने साजरा केला जातो. याप्रसंगी त्यांनी खास आशिर्वाद दिले.

” या पौर्णिमेच्या रात्री, भगवान श्रीकृष्णाने स्वतः गोपींसोबत रास केला, कारण त्यांनी त्याच्या आज्ञांचे निष्ठेने पालन केले होते. आपणही जर देवाच्या आज्ञेचे पालन केले तर देव आपला होईल आणि (त्याचा) आपल्याला लाभ होईल. शरद पौर्णिमा ही वाल्मिकि जयंती म्हणून देखील साजरी केली जाते.” असे त्यांनी सांगितले.

“शरद पौर्णिमा हा भगवान स्वामीनारायणांचे महान भक्त गुणातितानंद स्वामींचा वाढदिवस आहे. ते अक्षर ब्रह्मदेवाचे अवतार होते; त्यांनी अनेक प्राण्यांना ब्रह्मपद प्रदान करण्याचे महान कार्य पूर्ण केले. ”

” असे अलौकिक जीव पृथ्वीवर नेहमीच उपस्थित असतात. त्यांच्या सहवासातून जीवन अर्थपूर्ण बनते.” असे त्यांनी नमूद केलं.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष