AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: एखादा व्यक्ती लोकांचा आवडता लीडर कसा होतो? चाणक्य म्हणतात हे 4 गुण महत्वाचे!

आचार्य चाणक्यने चाणक्यनितीत एका यशस्वी नेत्याच्या चार विशेष गुणांचा उल्लेख केला आहे. त्यांचं असं म्हणणं होतं, ज्या व्यक्तीत हे चार गुण असतात तो सर्वांचा आवडता नेता होतो..

Chanakya Niti: एखादा व्यक्ती लोकांचा आवडता लीडर कसा होतो? चाणक्य म्हणतात हे 4 गुण महत्वाचे!
Acharya_Chanakya
| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 7:23 AM
Share

मुंबई : लहान मोठ्या प्रमाणात सगळ्यांकडेच नेतृत्व गुण असतात. घरात, शाळेत, ऑफिसात कुठेही ते दिसून येतात. पण काही जणच असे असतात ज्यांचे नेतृत्व गुण लोकांच्या पसंतीस उतरतात. लोक अशा व्यक्तीवर प्रेम करतात, त्याच्या शब्दाला मान देतात, तो जे काही सांगतो आहे, त्याचं अनुसरण करतात. आचार्य चाणक्यनेही अशा नेत्यामध्ये असणाऱ्या चार विशेष गुणांचा उल्लेख केला आहे. पाहुयात ते गुण नेमके कोणते आहेत. (4 quality which Every leader Should According Chanakya niti)

दातृत्वं प्रियवक्तृत्वं धीरत्वमुचितज्ञता अभ्यासेन न लभ्यन्ते चत्वारः सहजा गुणाः

1. धैर्य:

जीवनात सुख दु:ख दोन्ही असतात. ते येतात जातात. पण दोन्ही प्रसंगात धैर्य ठेवणं महत्वाचं. ज्या व्यक्तीकडे धैर्य असतं, तो वाईट वेळेतही आपलं काम सहज पार पाडतो. त्यातूनच तो इतरांना प्रेरित करु शकतो. धैर्यवान लोक योग्य वेळेची वाट पहात योग्य निर्णय घेतात.

2. वचन:

कुठल्याही व्यक्तीची ओळख तो काय बोलतो यावरुन होते. एखादा व्यक्ती कडवट बोलत असेल तर त्या व्यक्तीला कुणी लक्षात ठेवणार नाही. पण तोच व्यक्ती जर गोड बोलत असेल, त्याच्या वाणीत गोडवा असेल तर लोक त्याचं ऐकतात. एका चांगल्या लीडरला त्याची वाणी गोड असेल याची काळजी घ्यावी लागते.

3. दान:

ज्या व्यक्तीत कुणाला काही देण्याची भावना नसते तो ना इतरांचं दु:ख समजू शकतो ना, त्यांचं भलं करु शकतो. एका यशस्वी नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे दातृत्वाची भावना असते. जो दान देतो त्याचा अहंकारही समाप्त झालेला असतो. अशा नेत्याला सर्वजण पसंत करतात.

4. निर्णय क्षमता:

निर्णय क्षमता ही नेतृत्व गुणाची अट आहे. जीवनात कधी कुठली वेळ येईल हे कुणालाच माहित नाही. अशा वेळी एका चांगला निर्णय लोकांचं कल्याण करु शकतो आणि नेतृत्व करणाऱ्याकडे ती क्षमता नसेल तर लोकांचं नुकसानही करु शकतो. त्यामुळेच वेळ काळ पाहुण जो निर्णय घेतो तोच खरा नेता असतो.

(4 quality which Every leader Should According Chanakya niti)

हे ही वाचा :

‘या’ ग्रहाच्या अशुभ स्थितीची रिलेशनशिपवर वक्रदृष्टी, घटस्फोटापर्यंत जाऊ शकतं प्रकरण!

लग्नासाठी मुलगी शोधताय?, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Follow Us
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित.