AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ ग्रहाच्या अशुभ स्थितीची रिलेशनशिपवर वक्रदृष्टी, घटस्फोटापर्यंत जाऊ शकतं प्रकरण!

कुंडलीत जर मंगळ शुभ स्थितीत असेल तर जीवन मंगलमय होतं आणि मंगळ जर अशुभ असेल तर आयुष्यात अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. पाहुयात मंगळाचा अशुभ प्रभाव आणि त्यावरचे काही उपाय... (Mangal planet in kudali Spoil the relationship Create Divorce Situation)

'या' ग्रहाच्या अशुभ स्थितीची रिलेशनशिपवर वक्रदृष्टी, घटस्फोटापर्यंत जाऊ शकतं प्रकरण!
mangal planet in kudali
| Edited By: | Updated on: Jun 04, 2021 | 10:25 AM
Share

मुंबई : मंगळाला ग्रहांचा सेनापती मानलं जातं. एखाद्याचं लग्न जमवायचं असेल तर कुंडलीत मंगळ आहे की नाही हे आवर्जून पाहिलं जातं. जर मंगळ शुभ स्थितीत असेल तर जीवन मंगलमय होतं आणि अशुभ स्थितीत असेल तर आयुष्याची वाट लागू शकते अशी धारणा आहे. त्यातल्या त्यात मंगळाचा वैवाहिक जीवन, प्रेम संबंधावर परिणाम पडतो, असं मानलं जातं. मंगळ अशुभ स्थितीत असेल तर नवरा बायकोमध्ये भांडणं होऊ शकतात. कारण मंगळ हा उग्र ग्रह मानला जातो. अशा स्थितीत अनेक वेळा घटस्फोटही होतात. (mangal planet in kudali Spoil the relationship Create Divorce Situation)

ज्योतिषांनुसार, कुंडलीत 1, 4, 7, 12 ह्या स्थानांवर मंगळ असेल तर तो मंगळ दोष मानला जातो. अशा लोकांना मांगळीक म्हटलं जातं. मंगळाची अशुभ स्थिती स्वभाव रागीट करते. अशा स्थितीत व्यक्तीचा आत्मविश्वास कमजोर होतो. एवढच नाही तर वैवाहिक जीवनात संकटं येऊन आयुष्य अस्थिर होऊ शकतं.

अशुभ मंगळ कोणती संकटं आणतो?

1.पती पत्नीत भांडणं होतात, सगळं चांगलं चाललेलं असेल तर बिघडू शकतं.

2.पती पत्नीचे संबंध हे संवेदनशिल बनतात. नातेसंबंधात रागीटपणा वाढत जातो.

3.नेहमी भांडणं होतात, त्यातुन घरात तणाव निर्माण होतो. संवाद संपतो.

4.पती पत्नीचे भांडण घटस्फोटापर्यंत जातं, अनेक वेळा कोर्ट कचेरी मागे लागते.

5. जमीन, संपत्ती, धन दौलत यावरुनही अनेक समस्या निर्माण होतात.

6. रक्तासंबंधी समस्या उदभवू शकतात.

शनी दोष दूर करण्यासाठी उपाय कोणते?

जर कुंडलीत मंगळ ग्रह अशुभ स्थितीत असेल तर त्याला शांत करण्याचे काही उपाय आहेत. ते पाहुयात कोणते आहेत?

1. हनुमानाची पुजा करावी, त्याला वस्त्र घालावं. विवाहित महिलांनी पतीकडून हे वस्त्रं चढवावं.

2. रोज हनुमान चालिसा म्हणावी. मंगळवारी सुंदरकांडाचं पठण करावं.

3. तांब्याच्या ग्लासात पाणी प्यावं, माकडांना गुळ चने खाऊ घालावे.

(Mangal planet in kudali Spoil the relationship Create Divorce Situation)

हे ही वाचा :

या 5 राशींची लोकं बोलताना किंवा कोणतंही पाऊल उचलताना एक क्षणही विचार करत नाही!

लग्नासाठी मुलगी शोधताय?, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.