AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ ‘ओम’ नामाचा जप केल्याने सर्व संकट दूर होतील, जाणून घ्या जपाचे पौराणिक महत्त्व

शतकानुशतके आपले ऋषी-मुनी कठोर तपस्या करताना याच मंत्राचा जप करत असे. ओम या शब्दाचा आवाका खूप मोठा आहे. याचे फायदे एखाद्या चमत्कारासारखे आहेत. चला तर मग जाणून घेऊया ओमच्या कल्याणकारी शक्तींबद्दल.

केवळ 'ओम' नामाचा जप केल्याने सर्व संकट दूर होतील, जाणून घ्या जपाचे पौराणिक महत्त्व
Lord-Shiva
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Jan 04, 2022 | 7:10 AM
Share

मुंबई : हिंदू धर्माची ओळख ‘ओम’ या शब्दाने होते. हिंदू धर्मावर श्रद्धा असलेले लोक ‘ओम’चा उच्चार करतात. पुराणात ‘ओम’ जप करण्याचे अनेक फायदे देखील सांगितले आहेत. वास्तविक, हिंदू धर्मात मंत्रांच्या जपाचे विशेष महत्त्व आहे आणि सर्व मंत्रांचा उच्चार ओमने सुरू होतो.  ओम हा शब्द नसून सर्व जग त्यात व्याप्त आहे.

शतकानुशतके आपले ऋषी-मुनी कठोर तपस्या करताना याच मंत्राचा जप करत असे. ओम या शब्दाचा आवाका खूप मोठा आहे. याचे फायदे एखाद्या चमत्कारासारखे आहेत. चला तर मग जाणून घेऊया ओमच्या कल्याणकारी शक्तींबद्दल.

ओम चे पौराणिक महत्त्व सनातन धर्माच्या मान्यतेनुसार ओमच्या उच्चारात संपूर्ण विश्वाचे ज्ञान दडलेले आहे. केवळ ओमचा जप केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर करतात. ओमचा जप केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हा आवाज मानवी श्रवणशक्तीपेक्षा खूप उच्च आहे. आकाशाच्या कवेत गेल्यानंतर ही हा आवाज येतो अशी मान्यता आहे. ‘ओम्’ उच्चारण करताना तोंडातून ‘म’ चा आवाज येतो तेव्हा ते आपल्या मेंदूला ऊर्जा देते आणि त्यामुळे व्यक्तीच्या मानसिक शक्तींचा विकास होतो.

‘ओम’चे फायदे

  • ओम नामच्या जपामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते.
  • यामुळे तुम्ही कोणताही तणावापासून मुक्तता मिळवू शकता, हा जप तुम्हाला चिंतामुक्त करतो.
  • यामुळे तुमच्या भावनांचा समतोल राखण्यास आणि तणावपूर्ण परिस्थितीतही शांत राहण्यास मदत होते.
  • ओमचा जप केल्याने एखादया गोष्टीतला तुमचा फोकस सुधारतो.
  • तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता शक्ती सुधारते.
  • हा जप तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि तुम्हाला अधिक आशावादी बनवते.
  • रागासारख्या नकारात्मक भावनांपासून दूर राहण्यास मदत करते.

उच्चार करताना या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही नेहमी स्वच्छ आणि मोकळ्या वातावरणात ओमचा उच्चार करावा. ओमचा उच्चार केल्याने श्वास वेगवान होतो, अशा स्थितीत मोकळ्या जागेवर ओमचा उच्चार केल्याने सकारात्मकता प्राप्त होते. सुखासन, पद्मासन, वज्रासन इत्यादी ठिकाणी बसून ओमचा उच्चार करता येतो. याशिवाय ॐ 5,7,11 किंवा 21 वेळा उच्चारणे उपयुक्त मानले जातात.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंंधित बातम्या : 

VIDEO : मनी माऊची भरली शाळा ! शिक्षिका पाहून थक्क व्हाल, पाहा खास व्हायरल व्हिडीओ!

VIDEO :  उणे 56 तापमानात हरण गारठले, पुढे लोकांनी काय केले पाहा थक्क करणारा व्हिडीओ!

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं