AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Where we should live | कुठल्या ठिकाणी राहण्यासाठी शास्त्रात काय नियम सांगण्यात आले आहेत, कुठल्या स्थानी व्यक्तीने क्षणभरही थांबू नये, जाणून घ्या

सनातन परंपरेत जीवनाशी संबंधित प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींबाबत इतकंच नाही तर शुभ आणि अशुभतेची काळजी घेण्यात आली आहे. हेच कारण आहे की कोणत्याही कार्यासाठी आपल्या धार्मिक ग्रंथात, शास्त्रात इत्यादीमध्ये सर्व प्रकारचे नियम सांगितले गेले आहेत. जे आपल्या सुख, शांती आणि समृद्धीशी संबंधित आहेत.

Where we should live | कुठल्या ठिकाणी राहण्यासाठी शास्त्रात काय नियम सांगण्यात आले आहेत, कुठल्या स्थानी व्यक्तीने क्षणभरही थांबू नये, जाणून घ्या
Where we should live
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Aug 20, 2021 | 7:15 AM
Share

मुंबई : सनातन परंपरेत जीवनाशी संबंधित प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींबाबत इतकंच नाही तर शुभ आणि अशुभतेची काळजी घेण्यात आली आहे. हेच कारण आहे की कोणत्याही कार्यासाठी आपल्या धार्मिक ग्रंथात, शास्त्रात इत्यादीमध्ये सर्व प्रकारचे नियम सांगितले गेले आहेत. जे आपल्या सुख, शांती आणि समृद्धीशी संबंधित आहेत. जर, आपण कोणत्याही ठिकाणी राहण्याबद्दल बोलत असू तर ज्योतिषशास्त्र आणि वास्तूनुसार, शुभ आणि अशुभ स्थानाचे पूर्ण स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

तर धार्मिक शास्त्रांमध्ये देखील एखाद्या स्थानाची परिस्थिती तसेच, लोकांचा व्यवहार पाहून तिथे राहण्याचा किंवा न राहण्याचा निर्णय घेण्यास सांगण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया त्या ठिकाणांबद्दल जिथे आपण चुकूनही राहू नये –

धनिक: श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पञ्चमः। पञ्चयत्र न विद्यन्ते न तत्र दिवसं वसेत्।।

आचार्य चाणक्य जे नीतिचे जाणकार आहेत त्यांचे असे म्हणणे आहे की ज्या देशात किंवा ठिकाणी एक धन-धान्य संपन्न व्यापारी, कर्मकांडात निपुण आणि वेदांचे जाणकार, पुजारी आणि ब्राह्मण, धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय राजा, स्वच्छ वाहणारे पाणी म्हणजे पिण्यायोग्य पाणी देणारी नदी किंवा तिचा कोणताही स्त्रोत नसेल अशा ठिकाणी आपण क्षणभरही थांबू नये. म्हणजे आपण ते ठिकाण लवकरात लवकर सोडून दुसऱ्या ठिकाणी जायला हवे.

आचार्य चाणक्या यांच्या धोरणामागे एक तर्कशास्त्र आहे कारण ज्या ठिकाणी श्रीमंत लोक राहणार नाहीत तेथे रोजगाराच्या संधी खूप कमी असतील. त्याचप्रमाणे, जिथे ज्ञानी लोक नाहीत, तेथे आपल्याशी संबंधित कोणताही चुकीचा किंवा योग्य निर्णय घेण्यासाठी कोणीही नसेल. कोणत्याही राज्यासाठी कुशल, न्यायी आणि धार्मिक राजाची अत्यंत आवश्यकता असते, अन्यथा तेथे निरंकुशता पसरेल आणि कोणीही चुकीचे आणि बरोबर करण्यापासून कोणालाही रोखू शकणार नाही. जीवनासाठी पाणी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, अशा परिस्थितीत स्वच्छ पाणी असलेली नदी किंवा पाण्याचे स्त्रोत असलेली जागा नसताना तेथे राहण्याचे कोणतेही औचित्य नाही. अशा काही आरोग्यविषयक समस्यांचे निदान करण्यासाठी, एक कुशल वैद्य किंवा आजच्या भाषेत सांगायचे तर एका चांगल्या डॉक्टरची खूप गरज आहे. अशा परिस्थितीत, चांगले डॉक्टर किंवा वैद्य नसलेल्या ठिकाणी राहू नये.

लोकयात्रा भयं लज्जा दाक्ष्ण्यिं त्यागशीलता। पंच यत्र न विद्यंते न कुर्यात्त्र संगतिम्।।

जिथे लोकांना त्यांची उपजीविका मिळत नाही, लोकांमध्ये भीती, लाज, आणि दान देण्याची प्रवृत्ती नसेल अशा पाच ठिकाणांचा मोह करु नये. म्हणजेच त्या स्थानाचा तात्काळ त्याग करावा.

यस्मिन देशे न सम्मानो न वृत्तिनं व बांधवा: न च विद्यागमोप्यस्ति वासस्त्त्र न कारयेत्।।

ज्या देशात आदर नाही, जिथे रोजगार नाही, जिथे बंधू-भाव नाही आणि जिथे शिक्षण शक्य नाही, असे स्थान तात्काळ सोडले पाहिजे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला करतील सोपं

Chanakya Niti : जगात सर्वात श्रेष्ठ मंत्र, तिथी, व्यक्ती आणि दान कुठले?, आचार्य चाणक्य काय सांगतात जाणून घ्या

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा