AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | जर तुम्ही ‘या’ तीन गोष्टी मानत असाल तर तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भासणार नाही

आचार्य चाणक्य हे नीति शास्त्र, समाज शास्त्र आणि अर्थ शास्त्राचे विद्वान होते (Chanakya Niti). त्यांनी आपल्या जीवन काळात अनेक अशा गोष्टी नीति शास्त्राच्या माध्यमातून सांगितल्या आहेत ज्यांचं अनुरण जर मनुष्याने आपल्या जीवनात केलं त्याच्या जीवनची दशा आणि दिशा दोन्हीबदलू शकते.

Chanakya Niti | जर तुम्ही 'या' तीन गोष्टी मानत असाल तर तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भासणार नाही
Chanakya Niti
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Apr 09, 2021 | 9:50 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य हे नीति शास्त्र, समाज शास्त्र आणि अर्थ शास्त्राचे विद्वान होते (Chanakya Niti). त्यांनी आपल्या जीवन काळात अनेक अशा गोष्टी नीति शास्त्राच्या माध्यमातून सांगितल्या आहेत ज्यांचं अनुरण जर मनुष्याने आपल्या जीवनात केलं त्याच्या जीवनची दशा आणि दिशा दोन्हीबदलू शकते. त्यांनी मनुष्याच्या प्रत्येक समस्येचं समाधान अगदी सुंदर पद्धतीने केलं आहे. त्यांच्या नीतिंमुळे मनुष्य आपल्या योग्य गंतव्य स्थानापर्यंत पोहोचू शकतात (Acharya Chanakya Said If You Respect These Three Things In Your Life Goddess Lakshmi Will Be happy In Chanakya Niti).

चाणक्य सांगतात की, जर मनुष्य आपल्या जीवनात या तीन प्रकारच्या लोकांचा सन्मान करतील तर त्यांच्या आयुष्यात कधीही आर्थिक समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात असं काही व्हावं तर तुम्ही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टींचं स्मरण आणि अनुसरण करणेही गरजेचं आहे.

चाणक्य नीतिच्या तिसऱ्या अध्यायात 21 व्या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात –

मूर्खा यत्र पूज्यते धान्यं यत्र सुसंचितम्। दंपत्यो कलहो नास्ति तत्र श्री: स्वयमागत:।।

या श्लोकच्या माध्यमातून आचार्य चाणक्य सांगतात की, जिथे मुर्खांना सन्मान मिळत नसेल, जिथे धान्य चांगल्या पद्धतीने सांभाळून ठेवलं जात असेल आणि जिथे पती-पत्नी यांच्यात भांडण होत नसेल, तिथे लक्ष्मीजी स्वत: निवास करतात आणि धन-धान्याची कमतरता होत नाही.

विद्वानांचा आदर करा –

चाणक्य सांगतात की विद्वानांचा नेहमी आदर करायला हवा मुर्खांचा नाही. जे याची काळजी घेत नाहीत त्यांच्या आयुष्यात नेहमी कष्ट आणि संपत्तीची कमतरता राहाते. त्यामुळे असं करु नये.

धान्याचा सन्मान करा –

धान्याला देवी लक्ष्मीचं स्वरुप मानलं जातं. त्यामुळे धान्य वाया घालवणाऱ्यांवर देवी लक्ष्मी नेहमी क्रोधित राहाते. त्यामुळे ज्या घरात धान्याचा सन्मान होत नाही त्या घरात देवी लक्ष्मीचा वास राहात नाही. पण ज्या घरात धान्य काळजीपूर्वक ठेवलं जातं, तिथे नेहमी देवी लक्ष्मीचा निवास राहातो.

पती-पत्नीमध्ये भांडण होत नाही –

ज्या घरात पती-पत्नीमध्ये भांडण होत नाही आणि त्यांच्यामध्ये प्रेम राहातं, त्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो, कारण पत्नीला गृह लक्ष्मी म्हटल्या गेलं आहे. त्यामुळे पतीमंनी नेहमी आपल्या पत्नीचा सन्मान करायला हवा.

Acharya Chanakya Said If You Respect These Three Things In Your Life Goddess Lakshmi Will Be happy In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Lord Shree Krishna | जेव्हा एका भक्तासाठी खुद्द भगवान श्रीकृष्ण साक्ष द्यायला आले! जाणून घ्या ही पौराणिक कथा…

Chanakya Niti | ‘या’ गोष्टी करण्यापासून एखाद्या व्यक्तीने कधीही लाजू नये, अन्यथा नुकसान होणार

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्यानुसार एका पुरुषामध्ये ‘हे’ चार गुण असायलाच हवे…

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?