AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | जीवनात मान-सम्मान हवाय, तर ही कामे चुकूनही करु नये

आचार्य चाणक्य यांची गणना अत्यंत विद्वान लोकांमध्ये केली जाते. त्यांच्याकडे कुशल मुत्सद्दीपणा, राजकारण आणि अर्थशास्त्राचे उत्तम ज्ञान होते. आपल्या आयुष्यातील कठीण परिस्थितीत त्यांनी कधीही हार मानली नाही. आचार्य चाणक्य यांचा सर्वात मोठा शत्रू घनानंद यांचा नाश करुन एका साध्या मुलाला चंद्रगुप्तला मौर्याला सम्राट बनवले होते. त्यांनी अनेक पुस्तके आणि ग्रंथ लिहिले. चाणक्य हे कौटिल्य आणि विष्णू गुप्त म्हणून ओळखले जातात.

Chanakya Niti | जीवनात मान-सम्मान हवाय, तर ही कामे चुकूनही करु नये
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 27, 2021 | 7:23 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य यांची गणना अत्यंत विद्वान लोकांमध्ये केली जाते. त्यांच्याकडे कुशल मुत्सद्दीपणा, राजकारण आणि अर्थशास्त्राचे उत्तम ज्ञान होते. आपल्या आयुष्यातील कठीण परिस्थितीत त्यांनी कधीही हार मानली नाही. आचार्य चाणक्य यांचा सर्वात मोठा शत्रू घनानंद यांचा नाश करुन एका साध्या मुलाला चंद्रगुप्तला मौर्याला सम्राट बनवले होते. त्यांनी अनेक पुस्तके आणि ग्रंथ लिहिले. चाणक्य हे कौटिल्य आणि विष्णू गुप्त म्हणून ओळखले जातात.

चाणक्य यांनी नैतिकतेमध्ये जीवनातील विविध पैलूंबद्दल सांगितले आहे. त्यांनी संपत्ती, प्रगती, मैत्री, शत्रुत्व, यशाशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे. चाणक्य यांनी आपल्या पुस्तकात अशा गोष्टींबद्दल सांगितले आहे ज्याचा त्याग करणे चांगले आहे, अन्यथा जीवनात नेहमीच सन्मानाचे नुकसान होते.

निंदा करणे

आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्याने नेहमी निंदा करणे टाळावे. जे इतरांची निंदा करतात आणि त्यांच्या पाठीमागे त्यांच्याबाबत वाईट बोलतात. त्यांना आयुष्यात कधीच आदर मिळत नाही. अशा लोकांपासून नेहमी अंतर ठेवा. चाणक्य म्हणतात की जे इतरांचे वाईट करतात, ते नेहमी इतरांच्या हशा आणि घृणाचे कारण बनतात.

खोटे बोलणे

आपण नेहमी सत्याच्या मार्गावर चालायला हवे हे आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते. वाटेत कितीही अडचणी आल्या तरी सत्याचा मार्ग कधीही सोडू नये. चाणक्य यांच्या मते, जो माणूस यशस्वी होण्यासाठी असत्याचा मार्ग स्वीकारतो, त्याचे यश फार काळ टिकत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे सत्य इतरांसमोर येते तेव्हा त्याला लाज वाटायला लागते. म्हणून, कोणीही कोणतेही काम करण्यासाठी कधीही खोटे बोलू नये.

अतिशयोक्ती

काही लोक इतरांसमोर अतिशयोक्ती करतात. हे लोक इतरांसमोर स्वतःला श्रीमंत आणि प्रतिभावान दाखवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा अशा लोकांचे सत्य उघड होते तेव्हा त्यांना इतरांसमोर मान खाली घालावी लागते. चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने त्याच्या सामान्य व्यक्तिमत्त्वाबद्दल कधीही खोटे बोलू नये. तुमचा तुमच्या संस्कार आणि बुद्धीवर विश्वास असावा.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : व्यक्तीची पारख कशी करावी, या 4 गोष्टी लक्षात ठेवा

पत्नीवर संशय किंवा आर्थिक फटका, कधीही बोभाटा करु नये या 4 गोष्टींचा

Follow Us
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...