AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आचार्य चाणक्य सांगतात, ‘या’ सवयी आजच सोडा, नाहीतर आयुष्यभर गरीबच राहाल

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये अनेक उत्तम गोष्टी सांगितल्या आहे. ज्यामध्ये चाणक्य यांनी काही सवयी अशा सांगितल्या आहे, ज्या गरिबीतून बाहेर येण्यासाठी फार गरजेच्या आहेत.

आचार्य चाणक्य सांगतात, 'या' सवयी आजच सोडा, नाहीतर आयुष्यभर गरीबच राहाल
| Updated on: Jun 08, 2026 | 3:37 PM
Share

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती (Chanakya Niti) या पुस्तकात काही विशेष परिस्थितींचा उल्लेख केला आहे. प्रत्येकाला श्रीमंत होऊन समृद्ध जीवन जगण्याची इच्छा असते. यासाठी ते कठोर परिश्रम करतात. पण कितीही कमावले तरी काही लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. हे त्यांच्या काही सवयींमुळे होते. आचार्य चाणक्यांनी इशारा दिला आहे की, जर तुम्हालाही अशा सवयी असतील, तर तुम्हालाही आयुष्यभर गरीबच राहावे लागेल, तर जाणून घ्या चाणक्य यांनी कोणत्या सवयी सांगितल्या आहे. ज्या सोडणं गरजेचं आहे.

गरिबीकडे नेणाऱ्या सवयी खालीलप्रमाणे आहेत:

भविष्यासाठी पैसे न वाचवणे: प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचा काही भाग नेहमी वाचवला पाहिजे. जे पैसे वाचवत नाहीत ते गरीबच राहतात. आचार्य चाणक्यांच्या मते, व्यक्तीने आपल्या उत्पन्नाचा काही भाग भविष्यासाठी नेहमी वाचवला पाहिजे आणि वाचवलेले पैसे योग्य प्रकारे गुंतवले पाहिजेत. केवळ याच ज्ञानाने माणूस श्रीमंत होऊ शकतो.

अनावश्यक खर्च: जे लोक अनावश्यक खर्च करतात ते हळूहळू आपले पैसे गमावतात, ज्यामुळे एक दिवस ते गरिबीत लोटले जातात. चाणक्य तत्त्वानुसार, पैसे अनियोजितपणे खर्च करू नयेत. कोणत्याही कारणाशिवाय पैसे खर्च करण्याची सवय चांगली नाही. ही सवय माणसाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करते.

कर्ज घेणे: अनावश्यक कर्ज घेऊ नका, या सवयीमुळे व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कमजोर होते. आचार्य चाणक्य म्हणतात त्याप्रमाणे, विनाकारण कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. कारण ही सवय आपल्याला कर्जाच्या जाळ्यात अडकवेल. आणि आपल्याला आयुष्यभर ते कर्ज फेडावे लागेल. म्हणून अनावश्यक गोष्टींसाठी कधीही कर्ज घेऊ नका.

आळस: चाणक्य म्हणतात की गरिबीचे मुख्य कारण आळस देखील आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक संकटाचा सामना करायचा नसेल, तर तुम्ही आळस सोडला पाहिजे. केवळ आळस सोडूनच तुम्ही पैसे कमवू शकता आणि जीवनात यश मिळवू शकता.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप