AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आचार्य चाणक्य सांगतात, ‘या’ सवयी आजच सोडा, नाहीतर आयुष्यभर गरीबच राहाल

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये अनेक उत्तम गोष्टी सांगितल्या आहे. ज्यामध्ये चाणक्य यांनी काही सवयी अशा सांगितल्या आहे, ज्या गरिबीतून बाहेर येण्यासाठी फार गरजेच्या आहेत.

आचार्य चाणक्य सांगतात, 'या' सवयी आजच सोडा, नाहीतर आयुष्यभर गरीबच राहाल
| Updated on: Jun 08, 2026 | 3:37 PM
Share

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती (Chanakya Niti) या पुस्तकात काही विशेष परिस्थितींचा उल्लेख केला आहे. प्रत्येकाला श्रीमंत होऊन समृद्ध जीवन जगण्याची इच्छा असते. यासाठी ते कठोर परिश्रम करतात. पण कितीही कमावले तरी काही लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. हे त्यांच्या काही सवयींमुळे होते. आचार्य चाणक्यांनी इशारा दिला आहे की, जर तुम्हालाही अशा सवयी असतील, तर तुम्हालाही आयुष्यभर गरीबच राहावे लागेल, तर जाणून घ्या चाणक्य यांनी कोणत्या सवयी सांगितल्या आहे. ज्या सोडणं गरजेचं आहे.

गरिबीकडे नेणाऱ्या सवयी खालीलप्रमाणे आहेत:

भविष्यासाठी पैसे न वाचवणे: प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचा काही भाग नेहमी वाचवला पाहिजे. जे पैसे वाचवत नाहीत ते गरीबच राहतात. आचार्य चाणक्यांच्या मते, व्यक्तीने आपल्या उत्पन्नाचा काही भाग भविष्यासाठी नेहमी वाचवला पाहिजे आणि वाचवलेले पैसे योग्य प्रकारे गुंतवले पाहिजेत. केवळ याच ज्ञानाने माणूस श्रीमंत होऊ शकतो.

अनावश्यक खर्च: जे लोक अनावश्यक खर्च करतात ते हळूहळू आपले पैसे गमावतात, ज्यामुळे एक दिवस ते गरिबीत लोटले जातात. चाणक्य तत्त्वानुसार, पैसे अनियोजितपणे खर्च करू नयेत. कोणत्याही कारणाशिवाय पैसे खर्च करण्याची सवय चांगली नाही. ही सवय माणसाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करते.

कर्ज घेणे: अनावश्यक कर्ज घेऊ नका, या सवयीमुळे व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कमजोर होते. आचार्य चाणक्य म्हणतात त्याप्रमाणे, विनाकारण कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. कारण ही सवय आपल्याला कर्जाच्या जाळ्यात अडकवेल. आणि आपल्याला आयुष्यभर ते कर्ज फेडावे लागेल. म्हणून अनावश्यक गोष्टींसाठी कधीही कर्ज घेऊ नका.

आळस: चाणक्य म्हणतात की गरिबीचे मुख्य कारण आळस देखील आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक संकटाचा सामना करायचा नसेल, तर तुम्ही आळस सोडला पाहिजे. केवळ आळस सोडूनच तुम्ही पैसे कमवू शकता आणि जीवनात यश मिळवू शकता.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत