AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाणक्य म्हणतात… सर्वांनी आदर सन्मान द्यावा असं वाटतं, तर ‘या’ सवयी ताबडतोब सोडा

कुटुंबियांमध्ये कामाच्या ठिकाणी आदर सन्मान मिळावा असं प्रत्येकाला वाटत असतं... पण असं प्रत्येकासोबत होत नाही. कारण काही सवयींमुळे लोकं अनादर करतात. त्यामुळे काही सवयी वेळीच सोडणं गरजेचं आहे...

चाणक्य म्हणतात... सर्वांनी आदर सन्मान द्यावा असं वाटतं, तर 'या' सवयी ताबडतोब सोडा
| Updated on: Jun 05, 2026 | 3:00 PM
Share

प्रत्येकाला असं वाटतं की, आपल्याला सर्वांनी पसंत केलं पाहिजे… सर्वांना आपला आदर केला पाहिजे. कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि समाजात देखील लोकांनी आपल्याला आदर आणि सन्मान दिला पाहिजे असं… प्रत्येकाला वाटते. पण सर्वांकडून आदर आणि सन्मान मिळवायचा असेल तर, आपण आपल्या काही सवयी सोडल्या पाहिजेत किंवा बदलल्या पाहिजे… असं आचार्य चाणक्य म्हणतात. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार आदर मिळवण्यासाठी कोणत्या सवयी सोडणं गरजेचं आहे. हे प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे.

आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतिमूल्यांमध्ये केवळ राजकीय बाबीच नव्हे, तर जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी समजावून सांगितल्या आहेत . चाणक्य यांनी यश, संपत्ती, पती-पत्नीचं नातं, मैत्री, कुटुंब इत्यादी अनेक गोष्टींबद्दल सांगितलं आहे. त्यांनी दिलेल्या या सल्ल्यांचं पालन करून, एखादी व्यक्ती यशस्वी जीवन प्राप्त करू शकते.

त्याचप्रमाणे, आचार्य चाणक्यांनी दिलेल्या यापैकी काही सल्ल्यांचं पालन करून आदर मिळवणं सहज देखील शक्य आहे. प्रत्येकाला वाटतं की इतरांनी आपल्याला पसंत करावे, प्रत्येकाने आपला आदर करावा. जर तुम्हाला हा आदर मिळवायचा असेल, तर या काही सवयी सोडून द्या.

आदर मिळवण्यासाठी काय केले पाहिजे?

लोभ सोडा: आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाने कधीही लोभी होऊ नये. लोभ तुम्हाला इतरांपासून दूर ठेवतो आणि तुमच्या यशात अडथळा आणतो. लोभी व्यक्ती समाजात किंवा कुटुंबात कोणालाही आवडत नाही, अशा लोकांना कोणताही आदर मिळत नाही, म्हणून तुम्ही लोभ सोडला पाहिजे.

इतरांवर टीका करू नका: चाणक्य नीतीनुसार, इतरांवर टीका करणं हा चांगला गुण नाही. जे लोक इतरांवर टीका करतात त्यांना समाजात मान नसतो, अशा लोकांच्या आसपास कोणीही राहू इच्छित नाही. म्हणून, तुम्ही कधीही कोणावरही टीका करू नये. आणि तुम्ही टीकाकारांपासूनही दूर राहावे.

अहंकाराचा त्याग करा: आचार्य चाणक्य म्हणतात की मनुष्यामध्ये अहंकार नसावा. जो अहंकारी लोकांना नापसंत करतो, तो त्यांच्याबद्दल आदरही बाळगत नाही. हा अहंकार केवळ आदरच नष्ट करत नाही, तर तुमच्या यशातही अडथळा आणतो. म्हणून कधीही अहंकारी होऊ नका.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात