AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : कठीण काळातही हे 4 मित्र तुमच्या सोबत असतात, जाणून घ्या

आचार्य चाणक्य यांचे वचन नेहमीच फायद्याचे ठरतात (Acharya Chanakya). ते एक कुशल राजकारणी होते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची धोरणे अतिशय प्रासंगिक राहिली आहेत.

Chanakya Niti : कठीण काळातही हे 4 मित्र तुमच्या सोबत असतात, जाणून घ्या
Chanakya Niti
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jun 08, 2021 | 9:02 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य यांचे वचन नेहमीच फायद्याचे ठरतात (Acharya Chanakya). ते एक कुशल राजकारणी होते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची धोरणे अतिशय प्रासंगिक राहिली आहेत. त्यांनी आपल्या चाणक्य नितीतील व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित अनेक गूढ गोष्टींचा उल्लेख केला आहे (Acharya Chanakya Said These Four Friends Will Never Leave You Even In Difficult Situation).

आचार्य चाणक्य यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्तीशी असलेल्या संबंधाबद्दल बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या सुख-दु:खाशिवाय त्यांनी बऱ्याच गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या आहेत. त्या समस्या सोडवण्याचा मार्गही दर्शविला आहे.

आचार्य चाणक्य म्हणतात की, एखादा माणूस एकटाच जन्माला येतो आणि तो एकटाच मृत्यूला प्राप्त होतो, तोपर्यंत तो स्वत: त्याच्या चांगले आणि वाईट कृत्यांचे परिणाम भोगतो. तो त्याच्या कृतीच्या आधारावर नरकात किंवा स्वर्गात जातो. आज आम्ही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या अशाच उपदेशात्मक गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत –

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीच्या जीवनात असे चार व्यक्ती असतात जे कठीण परिस्थितीतही हार मानत नाहीत. ते कोण आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेऊया –

हे व्यक्ती जगातील सर्वात सुखी व्यक्ती असतात

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार, ते लोक या जगातील सर्वात सुखी लोक आहेत, ज्यांच्या मनात आपल्या नातेवाईकांबद्दल उदारतेची भावना आहे, अज्ञात लोकांबद्दल चांगल्या भावना आहेत आणि जे वाईट लोकांसोबत धूर्तपणे वागतात. ते विद्वानांपासून काहीही लपवत नाही आणि शत्रूंसमोर धैर्य दाखवतात.

ज्याने कोणतेही दान दिले नाही

आचार्य चाणक्य म्हणतात, त्यांना शक्य तितक्या लवकर सोडा, ज्यांच्या हातांनी काही दान दिले नाही, ज्यांचे कानांनी कोणतेही ज्ञान ग्रहण केले नाहीत, ज्यांच्या डोळ्यांनी परमेश्वराचा खरा भक्त पाहिला नाही, ज्यांचे पाय कधीही तीर्थक्षेत्रांवर पडले नाहीत, ज्यांने अधर्माच्या मार्गाने मिळवलेल्या संपत्तीने आपले पोट भरले आणि जो विनाकारण आपली मान उंच करुन असतो.

व्यक्ती आपल्या कर्माची फळं स्वत: भोगतो

चाणक्य नीतिच्यामते, व्यक्ती हा एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मृत्यूला प्राप्त होतो. तो स्वत:च्या चांगल्या आणि वाईट कृतीच्या परिणामांचे फळही स्वत:चं सहन करतो. तो एकटाच नरकात जातो किंवा स्वर्गात जातो.

पुण्य मृत्यूनंतर एकमेव मित्र

आचार्य चाणक्य म्हणतात की जेव्हा तुम्ही प्रवासाला जाता तेव्हा विद्यार्जन हा तुमचा खरा मित्र आहे. तसेच, घरी पत्नी आपली मित्र आहे. आपण आजारी असताना औषध हा आपला मित्र आहे आणि अर्जित पुण्य मृत्यूनंतरचा आपला एकमेव मित्र आहे.

Acharya Chanakya Said These Four Friends Will Never Leave You Even In Difficult Situation

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Follow Us
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?