AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | वाईट काळात खऱ्या मित्राप्रमाणे साथ देतात ‘या’ 4 गोष्टी

आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते (Acharya Chanakya). राजकारण, मुत्सद्देगिरी, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र इत्यादी सर्व विषयांचे ते एक महान जाणकार मानले जातात. आचार्य चाणक्य यांच्या तीक्ष्ण बुद्धी आणि कुशल युक्तीचा परिणाम म्हणजे त्यांनी एका सामान्य मुलाला राज सिंहासनावर बसवले.

Chanakya Niti | वाईट काळात खऱ्या मित्राप्रमाणे साथ देतात 'या' 4 गोष्टी
Acharya Chanakya
| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 7:33 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते (Acharya Chanakya). राजकारण, मुत्सद्देगिरी, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र इत्यादी सर्व विषयांचे ते एक महान जाणकार मानले जातात. आचार्य चाणक्य यांच्या तीक्ष्ण बुद्धी आणि कुशल युक्तीचा परिणाम म्हणजे त्यांनी एका सामान्य मुलाला राज सिंहासनावर बसवले. आचार्य यांनी आपल्या सर्व रचनांमध्ये त्यांचे अनुभव सांगितले आहेत. त्यातील एक म्हणजे चाणक्य नीति (Acharya Chanakya Said These Four Things Are Like True Friend In Difficult Times In Chanakya Niti).

या ग्रंथात लिहिलेल्या सर्व गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व त्रास टाळण्याचा मार्ग आणि संघर्षांवर सहज विजय मिळविण्याचे कौशल्य शिकवतात. आज या भागात आपण अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचे आचार्य यांनी कठीण काळातील खरा मित्र म्हणून वर्णन केले आहे आणि त्या संग्रहित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अन्नाचा साठा –

घरात अन्न साठवणे खूप महत्वाचे आहे. अन्न कठीण परिस्थितीत माणसाला सामर्थ्य देते. हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घरात अन्न-धान्य राहिले तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. भिकारी कधी घरात आला तर त्याने अन्नदानही केले पाहिजे. शास्त्रानुसार अन्नदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

पैसा –

आचार्यांनी पैशाला खरा साथीदार म्हटले आहे. जर पैसा जवळ असेल तर अनेक लोक आपल्या आजुबाजुला असतात आणि पैसे नसल्यास जवळचे व्यक्तीही सोडून जातात. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने पैसे गोळा केले पाहिजेत कारण हे कठीण काळात मदत करते. पैशाच्या मदतीने एखादी व्यक्ती सर्वात मोठा अडथळा देखील पार करु शकते.

गुरु –

गुरुची शिकवण एखाद्या व्यक्तीच्या सर्व समस्यांचे निराकरण करते, जीवनातील आव्हानांना तोंड देण्यास शिकवते. म्हणून, गुरुच्या शिक्षेचा संग्रह केला पाहिजे आणि वेळेनुसार त्याचं पालनही करावं.

औषधे –

घरात सामान्य आजार दूर करणाऱ्या औषधांचा संग्रह असणे आवश्यक आहे. कठीण परिस्थितीत ही औषधे व्यक्तीचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करतात. जर वेळेवर रोगांवर नियंत्रण ठेवले तर गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची गरज पडत नाही.

Acharya Chanakya Said These Four Things Are Like True Friend In Difficult Times In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | असं धन आणि ज्ञान कोणत्याही कामाचे नाही, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.