AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑफिसमध्ये त्रासदायक सहकाऱ्यांची मने कशी जिंकायची? काय सांगतात आचार्य चाणत्य…

ऑफिसमध्ये अनेक प्रकारचे, स्वभावाचे व्यक्ती असतात. अशात ऑफिसमध्ये सर्वांसोबत जुळवून घेणं फार कठीण असतात. यावर आचार्य चाणक्य यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. तर जाणून घ्या ऑफिसमध्ये त्रासदायक सहकाऱ्यांची मने कशी जिंकायची?

ऑफिसमध्ये त्रासदायक सहकाऱ्यांची मने कशी जिंकायची? काय सांगतात आचार्य चाणत्य...
| Updated on: Aug 30, 2026 | 1:11 PM
Share

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतिमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे. मुलांनी कसं राहिलं पाहिजे. समाजात वावरताना कसं राहिलं पाहिजे. स्त्रीयांनी पुरुषांनी कसं राहिलं पाहीजे, एवढंच नाही तर, ऑफिसमध्ये एखाद्या त्रासदायक सहकाऱ्याचं मन कसं जिंकायचं.. यावर चाणक्य यांनी अनेक महत्त्वाचं सल्ले दिले आहेत. सांगायचं झालं तर, आचार्य चाणक्य एक महान विद्वान आहेत. त्यांनी २३०० वर्षांपूर्वी कार्यालयीन राजकारणावर एक उत्तम विवेचन केलं होतं. तर जाणून घ्या आचार्य चाणक्य यांनी काय सांगितलं आहे…

सर्वात महत्त्वाचं म्हणजे,साम, दाम, भेद, दंड हे चाणक्याचे प्रसिद्ध सूत्र आहे. असं म्हटलं जातं की, ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे कठीण आहे, त्याच्याशी प्रथम सौम्य बोलावं, म्हणजेच शब्दांनी मन वळवावं. जर ते शक्य नसेल, तर थोडी मदत करून त्याच्यापर्यंत पोहोचावं, असा सल्ला त्यांनी दिला. त्यानंतर, भेद म्हणजे, त्याची कमजोरी ओळखून त्याला वेगळं करणं, आणि शेवटी, अधिकाऱ्यांकडे त्याची तक्रार करणे किंवा त्याला दूर ठेवणं.

अनेकांना माहिती नसतं पण, बाहेरील शत्रूपेक्षा आतला शत्रू अधिक धोकादायक असतो. अंतर्गत संघर्षाबद्दल त माहिती देण्यात आली आहे. चाणक्य म्हणतात की, जी व्यक्ती कार्यालयात तुमच्या शेजारी बसून तुमच्याशी चांगलं वागण्याचं नाटक करते, पण तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलते, तोच खरा शत्रू असतो. तुम्ही अशा लोकांना तुमच्या योजना आणि गुपिते सांगू नयेत, तुम्ही तुमच्या तोंडावर ताबा ठेवावा.

चाणक्य म्हणतात की सापाशी मैत्री करणे चांगले आहे, पण त्याच्यासोबत एकत्र राहू नये. म्हणजेच, दुष्ट व्यक्तीशीही वैर ठेवू नये. हसतमुख राहा, पण विश्वास ठेवू नका. कार्यालयात तुम्हाला न आवडणारी व्यक्ती असली तरी, सर्वांसमोर भांडू नका. आपले काम करा आणि व्यावसायिक राहा, असे ते सांगतात.

तुमचं काम बोललं पाहिजे, तुम्ही नाही. चाणक्य हेच सांगत आहेत की राजाची ओळख त्याच्या कामामुळे झाली पाहिजे, पण तुमची ओळख तुमच्या युक्तिवादांमुळे होऊ नये. जे तुम्हाला त्रास देतात, ज्यांना तुमचे काम आवडत नाही, जे तुम्हाला चिरडून टाकू पाहतात, त्यांच्यासमोर युक्तिवादाचा आधार घेऊ नका, असं चाणक्य म्हणाले. कामाचा दर्जा महत्त्वाचा आहे, तुमच्या कामाचा दर्जा आणि परिणामच तुम्हाला वाचवेल.

चाणक्य सर्वात शेवटी म्हणाले, “तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजं की तुम्ही प्रत्येकाला बदलू शकत नाही. पण जेव्हा तुम्हाला एखाद्यासोबत कसं राहायचं हे कळतं, तेव्हा कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नाही,” असं चाणक्य म्हणाले.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधव...
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... शिवसेना सुनावणीआधीच...
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदे धावले
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड