AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adhik Mass Wan : अधिक मासात जावायाला का देतात धोंड्याचे वाण? 33 आकड्याला का आहे विशेष महत्त्व

शिव भक्त ज्या प्रमाणे अधिक महिन्याची वाट पाहत असतात, त्याच प्रमाणे काही हौशी जावाईसुद्धा या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या महिन्यात जावायाला वाण देण्याचे महत्त्व आहे.

Adhik Mass Wan : अधिक मासात जावायाला का देतात धोंड्याचे वाण? 33 आकड्याला का आहे विशेष महत्त्व
अधिक मासाचे वाणImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 14, 2023 | 8:38 PM
Share

मुंबई : दर तीन वर्षातून एकदा अधिक महिना येतो. याला अधिक मास (Adhk Mas Wan) असेही म्हणतात. धार्मिक दृष्टीकोनातून या महिन्याला विशेष महत्त्व आहे. यंदा 18 जुलैपासून अधिक मासाला सुरूवात होत आहे. या महिन्यात शिव उपासना करण्याला देखील महत्त्व आहे. शिव भक्त ज्या प्रमाणे या महिन्याची वाट पाहत असतात, त्याच प्रमाणे काही हौशी जावाईसुद्धा या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. याचे कारण म्हणजे अधिक महिन्यात जावायाला मिळणारे धोंड्याचे वाण. या महिन्यात जावायाचे प्रचंड लाड पूरविले जातात. अधिक महिन्यात जावायाला इतके महत्त्व का आहे ते जाणून घेऊया.

काय असते धोंड्याचे वाण?

आपल्याकडे मुलगी आणि जावायाला लक्ष्मी नारायणाचा जोडा मानल्या जाते. अधिक मासात जावायाला दीप दान देण्याचेही महत्त्व आहे. हे पुण्यप्रत मानल्या जाते. अधिक महिना हा 33 दिवसांचा असतो. त्यामुळे या महिन्यात 33 या आकड्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या महिन्यात जावायाला वाण देतांना 33 अनारसे किंवा इतर तळणातले पदार्थ देण्याची पद्धत आहे. या सोबतच अनेक जण चांदीचा दिवा आणि सोन्याची भेटवस्तू देतात. अर्थातच सोन्या चांदिच्या वस्तू या वैकल्पित आहेत. प्रत्येक जण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार प्रथा पाळतो.

दीप दानाचे महत्त्व

भगवान विष्णू यांचा आशिर्वाद मिळविण्यासाठी दिप दानाला महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीवार्द मिळतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल चांदीचं का द्यावं तर लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे चांदीचं निरंजन द्यावं. जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहांचे वाईट परिणाम कमी होतात. म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलवतात. त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवतात. त्यासोबत 33 अनारसे, 33 बत्तासेसोबत एक चांदीचं निरांजन देतात. 33 दिव्याने जावयाला औक्षवान करतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.