AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshaya Tritiya 2023 : आज अक्षय तृतीयेला उघडणार गंगोत्री यमुनोत्रीचे दार, सुरू होणार चार धाम यात्रा

अक्षय तृतीयेसोबतच उत्तराखंडमध्ये चारधाम यात्राची (Char Dham Yatra 2023) औपचारिक सुरुवात होणार आहे. गंगा माताची पालखी शुक्रवारी दुपारी 12:15 वाजता मुखबा येथून रवाना झाली.

Akshaya Tritiya 2023 : आज अक्षय तृतीयेला उघडणार गंगोत्री यमुनोत्रीचे दार, सुरू होणार चार धाम यात्रा
गंगोत्री यमुनोत्रीImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 22, 2023 | 10:18 AM
Share

मुंबई : आज अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2023) आहे. हिंदू धर्मात हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आजपासून गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले होणार आहेत. यासोबतच अक्षय तृतीयेसोबतच उत्तराखंडमध्ये चारधाम यात्राची (Char Dham Yatra 2023) औपचारिक सुरुवात होणार आहे. गंगा माताची पालखी शुक्रवारी दुपारी 12:15 वाजता मुखबा येथून रवाना झाली. ती आज गंगोत्री धाममध्ये पोहोचेल. यावेळी लष्कराची 11 वी बटालियन जेकलाई आर्मी बँड माता गंगेच्या पालखी सोबत चालत आहे.

आज दुपारी उघडतील गंगोत्री-यमुनोत्रीचे दरवाजे

शुक्रवारी देवी गंगोत्रीच्या या पालखी यात्रेत देश-विदेशातील शेकडो भाविक सहभागी झाले होते. या पालखीचे नेतृत्व माता गंगा यांचे भाऊ समेश्वर देव करत होते. आज दुपारी 12.35 वाजता वैदिक मंत्रोच्चाराने गंगोत्री धाम भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहेत. तर यमुनोत्री धामचे दरवाजे दुपारी 12.41 वाजता उघडले जातील. यमुनोत्री धाम सध्या बर्फाच्छादित आहे. तिथे अधूनमधून बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे वाटेत निसरडी परिस्थिती निर्माण झाली आहे.

केदारनाथचे दरवाजे 25 एप्रिलला उघडतील

गंगोत्री धाममध्येही पाऊस पडत आहे. या पाऊस आणि बर्फवृष्टीचा भाविकांच्या उत्साहावर परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. चारधाम यात्रेत सहभागी होण्यासाठी शेकडो भाविक उत्तराखंडमध्ये पोहोचले आहेत. दुसरीकडे, केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिलला आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे 27 एप्रिलला उघडले जातील. जे सध्या गंगोत्री आणि यमुनोत्री धामला पोहोचले आहेत, तेच भाविक 3 दिवसांनी केदारनाथ आणि नंतर बद्रीनाथला रवाना होतील.

लाखो भाविकांनी केली नोंदणी

या वर्षीच्या चार धाम यात्रेसाठी देशभरातील 15 लाखांहून अधिक भाविकांनी त्यांची ऑनलाइन नोंदणी केली आहे. ही नोंदणी मोफत असून याद्वारे सरकार भाविकांची संख्या आणि त्यांच्या सुविधांवर लक्ष ठेवते. या प्रवासासाठी हरिद्वार आणि ऋषिकेश हे बेस कॅम्प मानले जातात. सध्या गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून शेकडो भाविक ऋषिकेशला पोहोचले असून त्यांची नोंदणी सुरू आहे. नोंदणीनंतर भाविक आपापल्या वाहनाने गंगोत्री-यमुनोत्रीकडे रवाना होतील.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.