AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshaya Tritiya 2023 : आज अक्षय तृतीयेला उघडणार गंगोत्री यमुनोत्रीचे दार, सुरू होणार चार धाम यात्रा

अक्षय तृतीयेसोबतच उत्तराखंडमध्ये चारधाम यात्राची (Char Dham Yatra 2023) औपचारिक सुरुवात होणार आहे. गंगा माताची पालखी शुक्रवारी दुपारी 12:15 वाजता मुखबा येथून रवाना झाली.

Akshaya Tritiya 2023 : आज अक्षय तृतीयेला उघडणार गंगोत्री यमुनोत्रीचे दार, सुरू होणार चार धाम यात्रा
गंगोत्री यमुनोत्रीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 22, 2023 | 10:18 AM
Share

मुंबई : आज अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2023) आहे. हिंदू धर्मात हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आजपासून गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले होणार आहेत. यासोबतच अक्षय तृतीयेसोबतच उत्तराखंडमध्ये चारधाम यात्राची (Char Dham Yatra 2023) औपचारिक सुरुवात होणार आहे. गंगा माताची पालखी शुक्रवारी दुपारी 12:15 वाजता मुखबा येथून रवाना झाली. ती आज गंगोत्री धाममध्ये पोहोचेल. यावेळी लष्कराची 11 वी बटालियन जेकलाई आर्मी बँड माता गंगेच्या पालखी सोबत चालत आहे.

आज दुपारी उघडतील गंगोत्री-यमुनोत्रीचे दरवाजे

शुक्रवारी देवी गंगोत्रीच्या या पालखी यात्रेत देश-विदेशातील शेकडो भाविक सहभागी झाले होते. या पालखीचे नेतृत्व माता गंगा यांचे भाऊ समेश्वर देव करत होते. आज दुपारी 12.35 वाजता वैदिक मंत्रोच्चाराने गंगोत्री धाम भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहेत. तर यमुनोत्री धामचे दरवाजे दुपारी 12.41 वाजता उघडले जातील. यमुनोत्री धाम सध्या बर्फाच्छादित आहे. तिथे अधूनमधून बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे वाटेत निसरडी परिस्थिती निर्माण झाली आहे.

केदारनाथचे दरवाजे 25 एप्रिलला उघडतील

गंगोत्री धाममध्येही पाऊस पडत आहे. या पाऊस आणि बर्फवृष्टीचा भाविकांच्या उत्साहावर परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. चारधाम यात्रेत सहभागी होण्यासाठी शेकडो भाविक उत्तराखंडमध्ये पोहोचले आहेत. दुसरीकडे, केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिलला आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे 27 एप्रिलला उघडले जातील. जे सध्या गंगोत्री आणि यमुनोत्री धामला पोहोचले आहेत, तेच भाविक 3 दिवसांनी केदारनाथ आणि नंतर बद्रीनाथला रवाना होतील.

लाखो भाविकांनी केली नोंदणी

या वर्षीच्या चार धाम यात्रेसाठी देशभरातील 15 लाखांहून अधिक भाविकांनी त्यांची ऑनलाइन नोंदणी केली आहे. ही नोंदणी मोफत असून याद्वारे सरकार भाविकांची संख्या आणि त्यांच्या सुविधांवर लक्ष ठेवते. या प्रवासासाठी हरिद्वार आणि ऋषिकेश हे बेस कॅम्प मानले जातात. सध्या गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून शेकडो भाविक ऋषिकेशला पोहोचले असून त्यांची नोंदणी सुरू आहे. नोंदणीनंतर भाविक आपापल्या वाहनाने गंगोत्री-यमुनोत्रीकडे रवाना होतील.

Follow Us
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा