AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ पाच लोकांचं मृत शरीर जाळणं म्हणजे महापाप; गरुड पुराण काय सांगतं?

हिंदू धर्मामध्ये जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या मृत शरीराला अग्नी दिला जातो. त्याचं मृत शरीर जाळण्याची प्रथा आहे. मात्र त्यासाठी देखील काही नियम आहेत, हे सर्व नियम गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहेत.

'या' पाच लोकांचं मृत शरीर जाळणं म्हणजे महापाप; गरुड पुराण काय सांगतं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 14, 2025 | 8:59 PM
Share

हिंदू धर्मामध्ये जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या मृत शरीराला अग्नी दिला जातो. त्याचं मृत शरीर जाळण्याची प्रथा आहे. मात्र त्यासाठी देखील काही नियम आहेत, हे सर्व नियम गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहेत. गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलेल्या नियमांनुसार जर मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार झाले, तर त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो, असं मानलं जातं. मात्र गरुड पुराणात अशा पाच लोकांबद्दल देखील सांगण्यात आलं आहे, ज्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या मृतदेहांना कधीच जाळलं जात नाही. जाणून घेऊयात गरुड पुराणामध्ये नेमकं काय सांगितलं आहे आणि हे पाच लोक नेमके कोण आहेत?

11 वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा

गरुड पुराणात दिलेल्या माहितीनुसार ज्या मुलाचं वय 11 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा मुलाचा मृत्यू एखाद्या कारणामुळे झाल्यास त्याला जाळलं जात नाही तर त्याला जमिनीत दफन केलं जातं. हिंदू धर्मामध्ये 16 संस्कारांपैकी मुंज नावाचा एक संस्कार आहे, जर एखाद्या बालकाची मुंज, अर्थात उपनयन संस्कार झाला नसेल तर त्याला देखील अग्नी दिला जात नाही. तसेच जर एखाद्या मुलीचा मृत्यू हा मासिक पाळी येण्याच्या आधीच झाला तर तिला देखील अग्नी देऊ नये असं गरुड पुराण सांगतं.

साधू -संत यांचा मृतदेह

साधू -संत यांनी आपल्या कठोर तपश्चर्येच्या जोरावर आपल्या शरीरावर ताबा मिळवलेला असतो, त्यांना त्यांच्या शरीराचा मोह नसतो, त्यामुळे त्यांचा मृतदेह जाळू नये, तो देखील दफन करावा असं गरुड पुराण सांगतं.

सर्प दंशाने मृत्यू झालेली व्यक्ती

ज्या व्यक्तीचा मृत्यू हा सर्पदंशामुळे झाला आहे, त्याचं शरीर देखील जाळू नये असं गरुड पुराण सांगतं. मान्यतेनुसार अशा व्यक्तीच्या शरीरात काही दिवस सुक्ष्म प्राण असतो. त्यामुळे त्याचं शरीर दफन करण्यात यावं, असं गरुड पुराणात म्हटलं आहे.

संसर्गजन्य आजारांमुळे मृत्यू झालेली व्यक्ती 

जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू संसर्गजन्य आजारामुळे झाला असेल तर त्याचं देखील शरीर जाळू नये, त्याच्या मृतदेहाचं देखील दफन करण्यात यावं असं गरुड पुराणामध्ये सांगीतलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू