AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दसऱ्याला ‘ही’ एक वस्तू खरेदी करा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल, कधीही कसलीही कमतरता भासणार नाही

दसरा हा शुभ सण असून या दिवशी अनेक पद्धतीने पूजा केली जाते. पण दसऱ्याच्या दिवशी एक वस्तू खरेदी करण्याचा मान असतो. आणि ती वस्तू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच घरात सुख-समृद्धी लाभते असे म्हटले जाते. अशी कोणती वस्तू आहे जाणून घेऊयात.

दसऱ्याला 'ही' एक वस्तू खरेदी करा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल, कधीही कसलीही कमतरता भासणार नाही
Buy a broom on Dussehra, you will receive the blessings of Goddess LakshmiImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Oct 01, 2025 | 4:43 PM
Share
दसरा हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक आहे. या दिवशी अनेक प्रकारे पूजा केली जाते. तसेच आख्यायिकेनुसार, भगवान रामाने या दिवशी लंकेचा राजा रावणाचा वध केला होता. शिवाय, देवी दुर्गेने दसऱ्याच्या दिवशी महिषासुर राक्षसाचा वध केल्याचे म्हटले जाते. म्हणूनच हा दिवस देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी, देवी दुर्गेची तसेच भगवान रामाची पूजा करतात.
दसऱ्याच्या दिवशी ही वस्तू  खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते.
तसेच दसऱ्याच्या दिवशी अशी एक वस्तू जी खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो. ती वस्तू म्हणजे झाडू.  दसऱ्यादिवशी झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याने अनेक सकारात्मक परिणाम आयुष्यात घडतात.
 देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतो
धनत्रयोदशी व्यतिरिक्त, दसऱ्याला झाडू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते, कारण ते देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ते तुमच्या घरातील अशुद्धता, नकारात्मकता आणि गरिबी दूर करते, त्यामुळे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतो आणि संपत्ती आणि समृद्धी येते. म्हणून, दसऱ्याला झाडू खरेदी करणे आवश्यक आहे.
दसऱ्याला ही वस्तू खरेदी का करावा?
दिवाळीची स्वच्छता दसऱ्यापासून सुरू होते. या दिवशी झाडू खरेदी करणे ही एक नवीन, शुभ सुरुवात असते. वास्तुशास्त्रानुसार, झाडू घरातील वास्तुदोष दूर करतो, ज्यामुळे आर्थिक लाभ आणि सौभाग्य मिळते असे म्हटले जाते.
दसऱ्याला घरात झाडू आणल्याने तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर होऊ शकतात. करिअर, व्यवसाय आणि नातेसंबंधांपासून ते सर्वत्र नवीन संधी निर्माण होताना दिसते. घरातून नकारात्मकता दूर होते आणि आनंद तसेच शांती नांदते.
दसऱ्याच्या वेळी काय उपाय करावे?
दसऱ्याच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून प्रार्थना करा. त्यानंतर बाजारातून गवत किंवा बांबूपासून बनवलेला झाडू आणा. घरी आणताना तो लाल कापडात किंवा लाल पिशवीत आणावा ते आणखी शुभ मानले जाते.  त्यानंतर, एकादशीला झाडू वापरायला काढला तरी चालेल. त्याचा वापर सुरू करा. तो तुमच्या घराच्या वायव्य कोपऱ्यात ठेवा. यामुळे घरात आनंद आणि समृद्धी येईल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार