AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti: जीवनात राहायचे असेल आनंदी आणि समाधानी तर आचार्य चाणक्य आयांनी सांगितले आहे नियम

आचार्य चाणक्य (Acharya Neeti) हे एक महान विद्वान तर होतेच पण ते उत्तम शिक्षक देखील होते. जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले आणि तेथे आचार्य पदावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. ते एक कुशल मुत्सद्दी, रणनीतिकार आणि अर्थशास्त्रज्ञ देखील होते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनात विचित्र परिस्थितींचा सामना केला होता परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही आणि […]

Chanakya Neeti: जीवनात राहायचे असेल आनंदी आणि समाधानी तर आचार्य चाणक्य आयांनी सांगितले आहे नियम
खोटे बोलू नका - आचार्य चाणक्य यांच्यामते व्यक्तीने कधीही खोटे बोलू नये. बरेच लोक इतरांशी खोटे बोलून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात. असे करणे चुकीचे आहे. यामुळे तुमची प्रतिष्ठा कमी होते. त्यामुळे कधीही खोटे बोलू नका.
| Updated on: Jul 24, 2022 | 4:14 PM
Share

आचार्य चाणक्य (Acharya Neeti) हे एक महान विद्वान तर होतेच पण ते उत्तम शिक्षक देखील होते. जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले आणि तेथे आचार्य पदावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. ते एक कुशल मुत्सद्दी, रणनीतिकार आणि अर्थशास्त्रज्ञ देखील होते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनात विचित्र परिस्थितींचा सामना केला होता परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही आणि त्यांचे ध्येय साध्य केले. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात आचार्य चाणक्य यांच्या वचनांचे पालन केले तर तो जीवनात कधीही चूक करणार नाही आणि यशस्वी पदावर पोहोचू शकतो. आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार मानवाने आपले जीवन शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी नेहमी सत्कर्म केले पाहिजे. जे चांगले आणि उत्कृष्ट कार्य करत नाहीत, त्यांना ना जीवनात यश मिळते आणि ना ते सुखी होऊ शकतात. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या भीतीने आणि संकटाने वेढलेले असतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये सांगितले की, जीवनात शांती आणि आनंद आणण्यासाठी या 4 कामांपासून दूर राहिले पाहिजे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चार गोष्टी.

आळशीपणापासून दूर रहा

आचार्य चाणक्यानेही आपल्या धोरणात आळसापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. आळस माणसाची प्रतिभा नष्ट करतो. आळशीपणामुळे व्यक्तीला लाभाच्या संधीपासून वंचित राहावे लागते. आळशी माणूस नेहमी ध्येयापासून दूर राहतो. त्यामुळे त्यापासून दूर राहण्यातच सर्वांचे भले आहे.

अहंकार टाळा

चाणक्य नीतीनुसार प्रत्येकाने अहंकारापासून दूर राहावे. अहंकार माणसातील सर्व काही नष्ट करू शकतो. अहंकार माणसाला सत्यापासून दूर नेतो. असे लोक स्वतःला श्रेष्ठ समजण्याची चूक करू लागतात. त्यामुळे लोक त्यांची बाजू सोडू लागतात आणि नंतर त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

क्रोध हा माणसाचा शत्रू आहे

क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, तो माणसाला खाऊन टाकतो. चाणक्य नीतीनुसार ज्या व्यक्तीला राग येतो त्याला कधीच आदर मिळत नाही. इतर लोक रागावलेल्या व्यक्तीपासून दूर राहतात. जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा असे लोक एकटे पडतात आणि दुःख सहन करतात.

कशाचही ढोंग करू नका

चाणक्याच्या नीतिमत्तेनुसार, जो व्यक्ती (ढोंग) दाखवत राहतो, त्यांच्या जीवनात शांतता येत नाही. असे लोक नेहमी अशा स्पर्धेत व्यस्त असतात ज्याला अंत नाही आणि महत्त्व नाही. खोटेपणा आणि चुकीच्या कृत्यांमध्ये गुंतण्याचे नाटक करणारी व्यक्ती. ज्याचा पुढे त्याला त्रास होतो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.