AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti : या 5 जणांना झोपेतून उठवण्याची चूक कधीच करू नका, अन्यथा पडेल प्राणाशी गाठ

आर्य चाणक्य हे एक महान कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामधून त्यांनी मानवाच्या कल्याणासाठी उपदेश केला आहे. चाणक्य म्हणतात या जगात अशा काही गोष्टी असतात त्यांना झोपेतून कधीही उठवू नका, नाहीतर तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो.

Chanakya Neeti : या 5 जणांना झोपेतून उठवण्याची चूक कधीच करू नका, अन्यथा पडेल प्राणाशी गाठ
चाणक्य नीती Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 30, 2025 | 7:00 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या आपल्या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर लिखाण केलं आहे. मानवाच्या कल्याणासाठी चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. थोडक्यात काय तर माणसानं जीवन कसं जगावं? जीवन जगत असताना कोणत्या चुका करू नयेत? त्या चुकांचे परिणाम काय असू शकतात? अशा एक ना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या जगात असे पाच जण आहेत, ज्यांना तुम्ही कधीच झोपेतून उठवण्याची चूक करू नका, कारण ते तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं. प्रसंगी तुमचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

राजा – चाणक्य म्हणतात कुठल्याही राज्यात राजा ही सर्वशक्तिमान व्यक्ती असते. त्यामुळे तुम्ही कधीही राजाची नाराजी ओढून घेऊ नका, त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. राजा जर तुमच्यावर प्रसन्न झाला तर तो नक्कीच तुम्हाला इनाम देईल, मात्र जर राजा तुमच्यावर नाराज झाला तर तो तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षाही देऊ शकतो. त्यामुळे जर राजा गाढ झोपला असेल तर त्याला झोपेतून उठवण्याची चूक करू नका.

सिंह – चाणक्य पुढे म्हणतात की जर तुम्ही एखाद्या जंगलामध्ये फिरण्यासाठी गेला आहात, आणि तिथे जर सिंह झोपलेला असेल तर त्याच्यापासून चार हाताचं अंतर ठेवून जंगलातून बाहेर पडा, त्याची झोप मोडू नका, कारण सिंहाची जर झोप मोडली तर तुमचा जीव संकटात येऊ शकतो.

लहान बालक – चाणक्य म्हणतात एखादं लहान मुलं जर शांत झोपलं असेल तर त्याला झोपेतून उठवू नका, कारण त्याची जर झोप पूर्ण झाली नाही तर तो रडणार, तुम्हाला त्यामुळे प्रचंड त्रास होऊ शकतो. त्यामुळे लहान मुलांना कधीही झोपेतून उठवू नये.

श्वान – चाणक्य म्हणतात जर श्वान शांत झोपले असेल तर त्याला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करू नका, कारण श्वान जर झोपेतून उठलं तर ते तुम्हाला चावा देखील घेऊ शकतं, त्यामुळे तुमचा जीव संकटात सापडू शकतो.

साप – चाणक्य म्हणतात जर साप गाढ झोपला असेल तर त्याला झोपेतून उठवण्याची चूक करू नका, त्याने चावा घेतल्यास तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार