AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti : या तीन घरांवर कायम असते लक्ष्मीची कृपा, आयुष्यात कधी नसते पैशांची कमी

चाणक्य हे एक महान अर्थतज्ज्ञ देखील होते, त्यामुळे त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये पैशांचं नियोजन कसं करावं? पैशांची बचत कशी करावी? कुठे पैसा खर्च करावा या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आजच्या काळातही लागू पडतात.

Chanakya Neeti : या तीन घरांवर कायम असते लक्ष्मीची कृपा, आयुष्यात कधी नसते पैशांची कमी
चाणक्य नीती Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 29, 2025 | 6:03 PM
Share

आर्य चाणक्य हे एक कुटनीती तज्ज्ञ होते, त्यामुळे त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये राज्यकारभारासंदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत, जसं की मित्र कसा ओळखायचा? आपला शत्रू कोण असू शकतो? राजाची कर्तव्य काय आहेत? समाजात वावरताना आपला व्यवहार कसा असला पाहिजे? अशा एक ना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत, मात्र चाणक्य हे केवळ कुटनीती तज्ज्ञच नव्हते तर ते एक अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यामुळे आयुष्यात पैसा किती महत्त्वचा आहे? आणि त्याची बचत कशी केली पाहिजे, याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात अशी तीन घरं असतात ज्या घरांवर सतत लक्ष्मी मातेची कृपा असते, अशा घरात कधीच पैशांची कमी भासत नाही, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

गुणवान लोकांचा सन्मान – चाणक्य म्हणतात ज्या घरात नेहमी विद्वानांचा आदर केला जातो, त्या घरावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहते, कारण जे लोक विद्वान असतात, गुणवान असतात. त्यांच्याकडून नेहमी कोणती न कोणती गोष्ट आपल्याला शिकायला मिळत असते, त्यामुळे आपली प्रगती होते.

भांडणं आणि वादापासून दूर – चाणक्य म्हणतात ज्या घरात नेहमी शांतता असते, घरात कधीही भांडणं होत नाहीत, कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांसोबत प्रेमानं राहतात त्या घरात कधीही पैशांची कमी नसते, अशा घरावर लक्ष्मी मातेचा सदैव आशीर्वाद असतो.

अन्नाचा सन्मान – चाणक्य म्हणतात अशी अनेक घर असतात जिथे अन्नाची प्रचंड प्रमाणात नासाडी केली जाते, गरज नसताना किंवा भूक नसताना देखील जास्तीच जेवण बनवलं जातं, त्यानंतर ते अन्न वाया जातं. ज्या घरात अन्न वाया जातं त्या घरात कधीही बरकत नसते, त्यामुळे अन्नाचा सन्मान केला पाहिजे, ज्या घरात अन्नाचा सन्मान केला जातो, त्या घरावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच आमचा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष
नातवंडांनी सांभाळ केला नाही; आज्जीने परत मिळवली कोट्यवधींची जमीन!
Latur | नातवंडांनी सांभाळ केला नाही; आज्जीने परत मिळवली कोट्यवधींची जमीन! व्हिडीओ होतेय व्हायरल
एकच खळबळ! शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या जीवाशी भयंकर खेळ,
एकच खळबळ! शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या जीवाशी भयंकर खेळ, प्रसादाच्या पॅकेटमध्ये...
नाशिक विधान परिषद जागेवरून भाजप-शिवसेनेत बिनसलं? शिंदेंनी अचानक...
नाशिक विधान परिषद जागेवरून भाजप-शिवसेनेत बिनसलं? शिंदेंनी अचानक बोलावली बैठक
कल्याण-शीळफाट्यावर भीषण आग! टायर गोदाम जळतंय, धुराने काळवंडलं आकाश
Kalyan Fire | कल्याण-शीळफाट्यावर भीषण आग! टायर गोदाम जळतंय, धुराने काळवंडलं आकाश
गटार पूजन करत ठाकरे सेनेचा संताप; ठाणे पालिकेविरोधात अनोखं आंदोलन!
Shivsena ubt | गटार पूजन करत ठाकरे सेनेचा संताप; ठाणे पालिकेविरोधात अनोखं आंदोलन!
लाखोंच्या घोडेबाजारीच्या चर्चा होत असतानाच भाजप नगरसेवकांचं मोठं पाऊल,
लाखोंच्या घोडेबाजारीच्या चर्चा होत असतानाच भाजप नगरसेवकांचं मोठं पाऊल, प्रत्येक 13 हजार... नेमकं काय घडलं?
मनसेचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन! हातात भांडे घेऊन सरकारविरोधात एल्गार
Nagpur MNS Protest | मनसेचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन! हातात भांडे घेऊन सरकारविरोधात एल्गार, नेमकं काय घडलं?