AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti : जेव्हा तुम्हाला वाटेल आता आयुष्यात सगळं संपलं, तेव्हा चाणक्य यांच्या या 3 गोष्टी आठवा

चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ फक्त राजा आणि राज्यकारभाराशीच संबंधित नाही तर माणसानं आपलं आयुष्य कसं जागवं? याचं तत्त्वज्ञान या ग्रंथामध्ये सांगण्यात आलं आहे.

Chanakya Neeti : जेव्हा तुम्हाला वाटेल आता आयुष्यात सगळं संपलं, तेव्हा चाणक्य  यांच्या या 3 गोष्टी आठवा
चाणक्य Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2025 | 7:17 PM
Share

चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, त्या काळात चाणक्य यांनी जे विचार या ग्रंथामध्ये मांडले आहेत, ते आजच्या युगातही तर्कसंगत वाटतात. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये ज्या नीती सांगितल्या आहेत, त्या आजही अनेकांना आपलं आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देतात. माणसानं आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात तत्त्वज्ञान चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. कधी-कधी परिस्थिती अशी येते, की माणूस पूर्णपणे खचून जातो. तो आपला आत्मविश्वास गमावून बसतो, आता आयुष्यात सगळं संपलं आहे, असं त्याला वाटू लागतं, त्याच्या डोक्यात नको ते विचार येऊ लागतात, त्याला पुढचा कोणताच मार्ग दिसत नाही, अशा अवस्थेत काय करावं? हे चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते?

संकटांचा सिंहाप्रमाणे सामना करा – चाणक्य म्हणतात तुमच्यावर कितीही मोठी संकट असू द्या, घाबरून जाऊ नका, त्या संकटाचा सामना हा सिंहाप्रमाणे करा. ज्याप्रमाणे सिंह शिकार करण्यापूर्वी दोन पाऊलं मागे जातो, तसंच आपल्याही आयुष्यात घडलं आहे, असं समजा आणि त्यानंतर अशी झेप घ्या की तुम्हाला यश हे मिळालंच पाहिजे. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडू नका.

संयम – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे ज्या गोष्टीची आवश्यकता असते तो म्हणजे संयम, चाणक्य म्हणतात तुमच्या पडत्या काळात तुम्ही संयम ठेवा, मात्र प्रयत्न करणं कधीही सोडू नका, एक दिवस हाच संयम तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणार आहे.

वेळ निघून जाते – एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ कधीही बसून राहत नाही, वाईट वेळ कधी न कधी निघून जाणार आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा आत्मविश्वासानं कामाला लागा, जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत प्रयत्न सोडू नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)

Follow Us
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.