AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात हे तीन गुण असलेली पत्नी म्हणजे पुरुषांसाठी वरदानच

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात हे तीन गुण असलेली पत्नी म्हणजे पुरुषांसाठी वरदानच
| Updated on: Jun 16, 2025 | 10:10 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. आयुष्य जगत असताना कोणत्या चुका करू नयेत? काय करावं याचं थोडक्यात सार आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. आदर्श पती कसा असावा, आदर्श पत्नी कशी असावी, आपला शत्रू कसा ओळखावा, मित्र कोणाला म्हणावे? राजा कसा असावा, त्याचा प्रजेसोबतचा व्यवहार कसा असावा? अशा एकना अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंंथामध्ये सांगितल्या आहेत.

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये आदर्श पत्नीची काही लक्षणं सांगितली आहेत. जर ही लक्षणं ज्या स्त्रीकडे असतील अशी स्त्री आपल्या पतीसाठी भाग्यवान असते. तिच्यामुळे घराची भरभराट होते, पतीची प्रगती होते. घरात पैशांची कधीही कमी राहत नाही, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे. जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं?

पैशांची बचत – आर्य चाणक्य म्हणतात ज्या स्त्रीला काट कसरीने संसार करण्याची सवय असते. जी स्त्री कधीही आपल्या पतीचे पैसे अनावश्य वस्तुंमध्ये खर्च करत नाही, अशा दाम्पत्यांचा संसार सुखाचा होतो. पत्नीने बचत केलेले पैसे त्यांना त्यांच्या संकट काळात उपयोगी पडतात.

प्रामाणिक पणा – आर्य चाणक्य म्हणतात स्त्री असो अथवा पुरुष दोघांनी देखील लग्नानंतर एकमेकांसोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे. पती -पत्नी ही संसाराची दोन चाके असतात. ती जर समान चालली तरच संसाराचा रथ व्यवस्थित चालतो. त्यामुळे नात्यामध्ये प्रामाणिकपणा असलाच पाहिजे.

मुलांना संस्कार –  आर्य चाणक्य म्हणतात पती अर्थजनासाठी बाहेर पडतो. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीमध्ये मुलांवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी ही स्त्रीवर असते. आईच मुलांवर उत्तम संस्कार करू शकते.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.