AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : मुलांसमोर असे कधीही वागू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप सहन करावा लागेल! 

आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला पण परिस्थितीसमोर कधीही हार मानली नाही. येणाऱ्या प्रत्येक संकटामधून त्यांनी शिकवण घेतली आणि पुढे जात राहिले. आचार्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे आणि अनुभवामुळे अशी कामे केली, ज्यासाठी ते आजही लक्षात आहेत.

Chanakya Niti : मुलांसमोर असे कधीही वागू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप सहन करावा लागेल! 
चाणक्य नीति
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 8:37 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला पण परिस्थितीसमोर कधीही हार मानली नाही. येणाऱ्या प्रत्येक संकटामधून त्यांनी शिकवण घेतली आणि पुढे जात राहिले. आचार्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे आणि अनुभवामुळे अशी कामे केली, ज्यासाठी ते आजही लक्षात आहेत. आचार्यांनी जीवनात जे काही अनुभव घेतले, त्याचे सार त्यांनी लोकांसमोर मांडले. आचार्य यांनी पालकांनाही मुलांच्या संगोपनाची शिकवण दिली आहे. येथे जाणून घ्या अशा वर्तनाबद्दल जे कधीही आपण आपल्या मुलांसमोर करू नये.

चुकूनही मुलांसमोर या गोष्टी करू नका

1. मुलांसमोर कधीही अनुशासनहीनता दाखवू नका. लक्षात ठेवा मुले निर्दोष असतात. त्यांच्यासाठी त्यांचे पालक ही पहिली शाळा असते. त्यांच्या पालकांनी त्यांच्यासमोर जे उदाहरण मांडले तेच ते शिकतात. मुलांसमोर अनुशासनहीनतेचे उदाहरण मांडले तर मुलं निरंकुश होतील आणि त्याचा फटका तुम्हाला भविष्यात सहन करावा लागेल.

2. बऱ्याच वेळा पालक काही गोष्टी लपवण्यासाठी मुलाला खोटे बोलण्यास सांगतात. परंतु जर मुलाने एकदा खोटे बोलणे शिकले तर तो भविष्यात नेहमी खोटे बोलेल. तुमच्याशीही खोटे बोलेल. म्हणूनच मुलांना कधीही खोटे बोलायला सांगू नका. किंवा त्यांच्यासमोर तुम्ही कधीही खोटे बोलू नका.

3. मुलांसमोर कधीही चुकीचे शब्द वापरू नका. तुम्ही ते शब्द कोणत्याही परिस्थितीत बोलता, परंतु मुलांना तुमची परिस्थिती समजणार नाही. ते फक्त तुमच्या शब्दांचे पालन करतील आणि तेच चुकीचे शब्द बोलायला शिकतील. त्यामुळे मुलांसमोर कधीही अयोग्य वर्तन करू नका.

4. आपल्या पत्नीचा कधीही अपमान करू नका आणि पत्नीनेही आपल्या पतीचा अपमान करू नये. मुलेही त्यांच्या पालकांकडून नातेसंबंधांचे महत्त्व जाणून घेतात. जर तुम्ही एकमेकांच्या आदराची काळजी घेतली नाही तर तुमचे मुलेही तेच करतील. त्यामुळे सर्व नातेसंबंधांचा नेहमी आदर करा.

संबंधित बातम्या : 

काय सांगता ! तुमच्या खाण्याच्या सवयी तुमचं नशीब बदलू शकतात? विश्वास बसत नसेल तर ट्राय करुन पाहा

Dream Indication | स्वप्नात मृत व्यक्ती आली? घाबरून जाऊ नका हा तर शुभ संकेत, जाणून घ्या तुमची स्वप्न तुम्हाला काय सांगतात

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.