AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : पती-पत्नीने या चार गोष्टी केल्याच पाहिजेत, नात्यात कधीच दुरावा येणार नाही, चाणक्यांनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी पती-पत्नीचं नातं कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातीलच काही गोष्टींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : पती-पत्नीने या चार गोष्टी केल्याच पाहिजेत, नात्यात कधीच दुरावा येणार नाही, चाणक्यांनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र
Chanakya Niti Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 28, 2026 | 9:38 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी पती-पत्नीचं नातं कसं असावं? आदर्श पत्नी कोणाला म्हणावं? आदर्श पतीची लक्षणं काय आहेत, अशा अनेक गोष्टींबाबत सविस्तर लिहून ठेवलं आहे. चाणक्य म्हणतात पती असो किंवा पत्नी दोघांनी देखील अशी कोणतीही कृती करू नये, ज्यामुळे आपल्या जीवनसाथीचं मन दुखावलं जाईल. जर वारंवार असे प्रसंग घडत असतील तर तो संसार फार काठ टिकू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा पती आणि पत्नी ही संसाररूपी रथाची दोन चाके आहेत. दोन्ही चाके समान गतीने चालली तर संसाराचा गाड धावत राहातो, मात्र यातील एक चाक जरी मागे पडले किंवा त्याने गती बदलली तर असा संसार फार काठ टिकत नाही. नात्यातील गोडवा कमी होतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. दरम्यान नात्यातील गोडवा टिकून राहवा यासाठी चाणक्य यांनी काही उपाय सांगितले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.

गोष्टी गुपीत ठेवा – चाणक्य म्हणतात पती-पत्नीमध्ये ज्या खासगी गोष्टी असतात त्या पतीने किंवा पत्नीने कधीही तिसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करू नये. जर दोघांमध्ये कोणत्याही कारणांमुळे वाद झाला असेल तर याची माहिती तिसऱ्या व्यक्तीला कधीही देऊ नये, तर दोघांनीच यावर मार्ग काढावा. तसेच इतरही अनेक अशा गोष्टी असतात ज्या तिसऱ्या व्यक्तीला कधीही सागू नये, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

अंहकार – चाणक्य म्हणतात पती-पत्नीने कधीही आपल्या नात्यात अहकांर आणू नये, जर नात्यात अंहकार असेल तर ते नातं फार काळ टिकत नाही.

विश्वास- चाणक्य म्हणतात पती-पत्नीने नेहमी एकमेकांवर विश्वास ठेवावा, ज्या नात्यात विश्वास असतो ते नातं दीर्घकाळ टिकतं.

प्रेम – चाणक्य म्हणतात पती-पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम असावं, प्रेम असेल तर संसार दीर्घकाळ टीकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.