AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात श्रीमंत व्हायचंय, मग चाणक्यांच्या या गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका, पाण्यासारखा पैसा कमवाल

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, परंतु त्याचबरोबर ते एक महान अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यामुळे माणसाने आपल्या हातात असलेल्या पैशांचं नियोजन कसं करावं? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांचे हे विचार आजही मार्गदर्शक ठरतात.

Chanakya Niti : आयुष्यात श्रीमंत व्हायचंय, मग चाणक्यांच्या या गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका, पाण्यासारखा पैसा कमवाल
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 08, 2026 | 9:38 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्याचबरोबर ते एक मोठे अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये एखादा माणूस कशापद्धतीने पैशांचं उत्तम नियोजन करून श्रीमंत बनू शकतो, याबद्दल त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या जगात जेवढं महत्त्व पैशांना आहे, तेवढं महत्त्व इतर कोणत्याही गोष्टीला नाहीये. माणसाच्या आयुष्यात पैसाच सर्व काही नाही, ही गोष्टी जरी खरी असली तरी देखील प्रत्येकासाठी पैसा हा खूप महत्त्वाच असतो. कारण माणसाला कोणत्याही प्रकारच्या संकटातून सोडवण्याची ताकद ही पैशांमध्ये असते. माणसावर जी काही त्याच्या आयुष्यात संकटं येतात त्यातील जवळपास 90 टक्के संकट ही पैशांमुळेच निर्माण झालेली असतात, त्यामुळे माणसाने आपल्या आयुष्यात बचत ही केलीच पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? याबद्दल चाणक्य यांनी तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहेत.

मोठेपणा दाखवू नका – चाणक्य म्हणतात असे अनेक लोक या समाजात असतात, त्यांच्या हातात पैसा आला की ते लोकांना मोठेपणा दाखवण्यासाठी पैसे खर्च करतात. त्यांचा सर्व पैसा असाच अनावश्यक कारणांसाठी खर्च होतो. परिणामी घरात गरिबी येते. त्यामुळे आपल्या हातात जो पैसा आहे, तो मानसाने नेहमी जपून वापरावा. आपल्याला गरजेच्या कोणत्या वस्तू आहेत? ते आधी लक्षात घ्यावं आणि त्यावरच पैसा खर्च करावा. माणूस हा जीवन आरामादायी जगण्यासाठीच पैसा कमावत असतो, त्याने तो खर्च देखील केला पाहिजे, परंतु सोबतच बचत देखील करावी असा सल्ला आर्य चाणक्य यांनी दिला आहे.

कष्ट करा – चाणक्य म्हणतात या जगात कोणाला काहीही फुकट मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कष्टच करावे लागतात. त्यामुळे जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर कष्ट करा. तुम्ही जर इतरांच्या संपत्तीवर नजर ठेवली आणि ती फसवणूक करून मिळवली देखील तरी अशी संपत्ती तुमच्या हातात फार काळ टिकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर आयुष्यात श्रीमंत व्हायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. हे कष्ट देखील योग्य दिशेनं व्हायला हवेत. तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

पैशांचा आदर करा – चाणक्य् म्हणतात मानसाने नेहमी नम्र असलं पाहिजे. तुम्ही जे कमावता त्याचा तुम्ही आदर केला पाहिजे. अनेक लोक असे असतात ते पैशांची उधळपट्टी करतात. जे लोक पैशांची उधळपट्टी करतात, त्यांच्या हातात कधीही पैसा टिकत नाही. त्यामुळे तुम्ही पैशांचा आदर केला पाहिजे. तर आणि तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. तसेच तुम्ही जो पैसा कमवता त्याची गुंतवणूक देखील योग्य ठिकाणी करावी, माणसाने आयुष्यात काही पैसा हा दान,धर्मासाठी देखील खर्च करावा असा, सल्ला देखील चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात