AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : तुमच्या यशात हे चार लोक कायम अडथळा निर्माण करतात, चाणक्य म्हणतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते म्हणतात समजात असे काही लोक असतात ज्यांना कधीच तुमचं यश बघवलं जातं नाही. ते कायम तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु असे लोक त्यांच्या आयुष्यात कधीच सुखी नसतात. त्यामुळे या लोकांकडे दुर्लक्ष करून तुम्ही पुढे चालत राहावं, यातच तुमचं हीत आहे.

Chanakya Niti : तुमच्या यशात हे चार लोक कायम अडथळा निर्माण करतात, चाणक्य म्हणतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा
chankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 18, 2026 | 9:30 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की या समाजात असे काही लोक असतात जे सतत तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांनी कधीही कोणाचंही सुख बघवत नाही. त्यामुळे तुम्ही अशा लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, परंतु अशा लोकांपासून सावध देखील राहिलं पाहिजे. जर तुम्ही बेसावध असाल तर तुमचा घात झालाच म्हणून समजा. जोपर्यंत तुम्ही गरीब असतात, तोपर्यंत या समाजात तुमचा एकही शत्रू नसतो. परंतु तुम्ही प्रगतीला सुरुवात केली, श्रीमंत झालात की लोक तुमचा द्वेष करू लागतात, कारण त्यांना तुमचं सुख बघवत नाही, त्यामुळे अशी लोक तुम्हाला ओळखता आली पाहिजेत. यातील काही लोक ही तर अगदी तुमच्या खूप जवळची असतात, असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

वाईट विचार करणारे लोक – चाणक्य म्हणतात जे लोक तुमच्याबद्दल कायम त्यांच्या मनात वाईट विचार ठेवून असतात, अशा लोकांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. अशा लोकांना फार महत्त्व देऊ नका, किंवा त्यांना घाबरू देखील नका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. परंतु अशा लोकांपासून सावध राहा. कारण असे लोक नेहमीच तुमच्याबद्दल वाईट विचार करत असतात. तुमच्यासोबत झालेली कोणतीही चांगली गोष्ट हे लोक पाहू शकत नाहीत, तुमचं वाईट कसं करता येईल याचाच हे लोक सारखा विचार करत असतात.

अज्ञानी लोक – चाणक्य म्हणता जे लोक अज्ञानी असतात, अशा लोकांसोबत कधीही जवळीक करू नये. कारण तुम्ही जर अशा लोकांसोबत जवळीक केली तर असे लोक आपलं स्वत:चं तर वाटोळं करतातच पंरतु त्यांच्यामुळे तुम्ही देखील मोठ्या संकटात सापडतात, त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करा, त्यांना फार महत्त्व देऊ नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कपटी लोक – चाणक्य म्हणतात या जगात काही कपटी लोक असतात, अशा लोकांना त्यांच्या स्वार्थाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. तुम्ही अशा लोकांचं कितीही भलं करा, परंतु एक दिवस हे लोक त्यांच्या स्वार्थासाठी तुमचा घात करणारच. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

रागीट लोक – चाणक्य म्हणतात जे लोक रागीट असतात, ज्यांना लगेच राग येतो, अशा लोकांकडे दुर्लक्ष करा. त्यांच्यासोबत केलेली मैत्री तुम्हाला महागात पडू शकतो. यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे अशा लोकांसोबत कधीही मैत्री करू नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन खचली, चक्क 233...
Power Corrupts...; ठाकरेंची पोस्ट व्हायरल! साटम प्रकरणावर सरकारला घेरल
Raj Thackeray | Power Corrupts...; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल! अमित साटम प्रकरणावर सरकारला घेरलं
मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप
Andheri Veera Desai Road | मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप, दुकानदारांचे मोठे नुकसान
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच पदाधिकाऱ्याचं
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याचं मोठं विधान; थेट नाव...
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य कार्यालयात...
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
धो धो येतो आणि झोडतच राहतो... मुंबई उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच...
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...
ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी..
Thane Rain | ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी जाहिर
राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिक
Mumbai Thane Helpline Number |राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन