AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या लोकांना कधीच आपले शत्रू होऊ देऊ नका, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की समजात असे काही लोक असतात, ज्यांच्यांशी तुम्ही कधीही शत्रूत्व घेऊ नका, कारण अशा लोकांमुळे भविष्यात तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं.

Chanakya Niti : या लोकांना कधीच आपले शत्रू होऊ देऊ नका, चाणक्य काय म्हणतात?
chankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 23, 2026 | 8:40 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असेत, की आपलं आयुष्य हे सुखी असावं, कोणत्याही प्रकारचा त्रास, कलह आपल्या आयुष्यात नसावा. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे या जगात अशा काही व्यक्ती असतात, ज्या व्यक्तींशी तुम्ही कधीही पंगा घेऊ नका, त्यांच्याशी शत्रूत्व करू नका. अशा लोकांपासून तुम्ही कायम सावध राहिलं पाहिजे, अशा लोकांसोबत मैत्री देखील करू नका आणि त्यांना कधीही आपले शत्रू देखील होऊ देऊ नका. कारण अशा लोकांपासून तुम्हाला भविष्यात मोठा धोका होऊ शकतो, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

कपटी लोक – चाणक्य म्हणतात जे कपटी लोक असतात, तुम्ही त्यांच्यांशी मैत्री केली तरी देखील ते तुम्हाला धोका देणारच असतात. ते आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मात्र तुम्ही जर अशा लोकांसोबत शत्रूत्व घेतलं तर मग विचारूच नका. ते तुम्हाला हरवण्यासाठी कोणतीही पातळी गाठू शकतात, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

सत्ताधारी लोक – चाणक्य म्हणतात ज्यांच्या हातात सत्ता आहे, अशा लोकांशी तुम्ही कधीही शत्रूत्व घेऊ नका, कारण असे लोक आपल्या हातात असलेल्या सत्तेच्या जोरावर काहीही करु शकतात, अशा लोकांपासून तुम्हाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात स्वार्थी लोकांसोबत मैत्रीही नसावी, आणि शत्रूत्व तर नसावच नसावं, अशा लोकांना कायम आपल्यापासू दूर ठेवावं. कारण असे लोक आपल्या स्वार्थासाठी तुम्हाला कधी धोका देतील हे सांगता येत नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या, व्हिडिओवर नेटकरी फिदा
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू
Roha Accident | खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
Maharashtra ATS Raid | महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर? थेट पाकिस्तानशी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी, म्हणाल्या...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दरोडा...
रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?; दोन दिवस रुग्णालयात...
Ramesh Mhatre Case | दोन दिवस रुग्णालयात उपचार...आता थेट कोर्टात!; रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?